AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Sanskrit Day: श्रावण पौर्णिमेला जागतिक संस्कृत दिवस का साजरा होतो? नेमका इतिहास काय? वाचा सविस्तर

जागतिक संस्कृत दिन किंवा संस्कृत दिन हा विश्वसंस्कृत दिनम म्हणूनही ओळखला जातो. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो.

World Sanskrit Day: श्रावण पौर्णिमेला जागतिक संस्कृत दिवस का साजरा होतो? नेमका इतिहास काय? वाचा सविस्तर
संस्कृत दिवस
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 1:42 PM
Share

नवी दिल्ली: जागतिक संस्कृत दिन किंवा संस्कृत दिन हा विश्वसंस्कृत दिनम म्हणूनही ओळखला जातो. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेत, श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. यंदा संस्कृत दिन 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज साजरा केला जात आहे. 2020 मध्ये संस्कृत दिवस 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला होता. तर, 2019 मध्ये तो 15 ऑगस्ट रोजी साजरा केला गेला होता.

संस्कृत भाषेचं पुनरुज्जीवन करण्याचा हेतू

संस्कृत दिन हा संस्कृत या प्राचीन भारतीय भाषेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संस्कृत भाषेबद्दल व्याख्यानांचं आयोजन केलं जातं.या दिवसाचा उद्देश संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करणे आणि तिचं संवर्धन करणे हा आहे. संस्कृत भाषेला उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आलंय. संस्कृत भाषेत सुमारे 102 अब्ज 78 कोटी 5 दशलक्ष शब्दांची सर्वात मोठी शब्दसंग्रह आहे.

नरेंद्र मोदी यांचं ट्विट

संस्कृत दिवसाचा इतिहास

जागतिक संस्कृत दिन किंवा संस्कृत दिन भारतात प्रथम 1969 मध्ये साजरा करण्यात आला. संस्कृत भाषेविषयी जागरूकता पसरवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी उत्सव साजरा केला जातो. संस्कृत भाषेला भारताच्या समृद्ध संस्कृतीचे हे वैशिष्ट्य मानलं जातं. संस्कृत दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये संस्कृत भाषेचं महत्व, त्याचा प्रभाव आणि या भाषेच्या संवर्धनाविषयी चर्चा केली जाते. हिंदू संस्कृतीत पूजा आणि मंत्रांचा जप संस्कृतमध्ये केला जातो. संस्कृत भाषेचा उगम भारतात सुमारे 3500 वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. संस्कृत भाषेला देव वाणी अर्थात देवाची भाषा असेही म्हणतात. संस्कृत भाषेची मुळे इसवी सन पूर्व 2000 पर्यंत जातात.

संस्कृत दिवसाचे महत्व

प्राचीन भारतीय भाषा संस्कृत विषयी जागृती करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासह पुनरुज्जीवित करण्यासाठी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत भाषा शिकण्याचे आणि जाणून घेण्याचे महत्त्व या दिवशी सांगितलं जातं. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी समजली जाते.भारतात बोलल्या जाणाऱ्या प्राचीन भाषांपैकी ती पहिली असल्याची सांगण्यात येतं. संस्कृत

1969 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या आदेशाने, केंद्र आणि राज्य स्तरावर पहिला संस्कृत दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून संपूर्ण भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो. प्राचीन भारतातील अध्यापन सत्र याच दिवशी सुरू झाले असल्यानं श्रावण पौर्णिमेची निवड करण्यात आली. संस्कृत भाषा दिवस आता भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

इतर बातम्या:

Corona Third Wave : महाराष्ट्राला दिलासा? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी नवी माहिती, तज्ज्ञ म्हणतात…

आपण एक सामर्थ्यवान नेता गमावलाय; कल्याण सिंहांना प्रभू श्रीरामाच्या चरणाशी स्थान मिळो: मोदी

World Sanskrit Day celebrated on Shraavana Fool Moon Night know what is its history and importance

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.