AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abu Salem : मुंबई हादरलेली, 257 नागरिकांचा झालेला मृत्यू, गँगस्टर अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज

Abu Salem : न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेचा उल्लेख केल्यानंतर याचिका 10 मार्च रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल, असे म्हटले आहे.

Abu Salem : मुंबई हादरलेली, 257 नागरिकांचा झालेला मृत्यू, गँगस्टर अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज
Abu Salem
| Updated on: Feb 19, 2025 | 9:11 AM
Share

मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गँगस्टर अबू सालेमने माफी मिळावी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात आपल्या शिक्षेला माफी मिळावी आणि तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार त्याने सुमारे 25 वर्षे तुरुंगवास भोगला आहे.

त्यामुळे त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी, असा दावा सालेमने वकील फरहाना शाह यांच्यामार्फत केलाय. न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेचा उल्लेख केल्यानंतर याचिका 10 मार्च रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल, असे म्हटले आहे.

मुंबई हादरलेली, किती नागरिकांचा मृत्यू झालेला?

अबू सालेम आता 63 वर्षांचा आहे. भारताकडे प्रत्यर्पण होण्याआधी पोर्तुगालच्या तुरुंगातील कारावास, खटला सुरु असतानाच्या काळातील तुरुंगवास असा कालावधी 25 वर्षांचा होतो. त्याशिवाय भारत आणि पोर्तुगालमध्ये प्रत्यर्पण कराराच्या ज्या अटी होत्या, त्या आधारावर अबू सालेमने लवकर सुटकेची मागणी केली आहे. 3 फेब्रुवारीला त्याने याचिका दाखल केली.

अबू सालेमवर काय जबाबदारी होती?

1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत विविध ठिकाणी शस्त्रास्त्र, दारुगोळा पोहोचवण्याचा अबू सालेमवर आरोप होता. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. मुंबई शेअर बाजार, झवेरी बाजार, एअर इंडिया इमारत, सी रॉक हॉटेल, जुहू सेंटॉर हॉटेल आणि अन्य ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. यात 257 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. 713 जण जखमी झाले होते.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन