AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्हेगारांच्या नांग्या ठेचत उत्तर महाराष्ट्रात 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त; वेगवेगळ्या प्रकरणांत 171 आरोपींना बेड्या

गेल्या काही महिन्यात नाशिक पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तब्बल 7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, कुत्ता गोळी, गुटखा आदींचा समावेश आहे.

गुन्हेगारांच्या नांग्या ठेचत उत्तर महाराष्ट्रात 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त; वेगवेगळ्या प्रकरणांत 171 आरोपींना बेड्या
उत्तर महाराष्ट्रात पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत गुन्हेगारांना वेसण घातली आहे.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 30, 2021 | 4:51 PM
Share

नाशिकः गेल्या काही महिन्यात नाशिक पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तब्बल 7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, कुत्ता गोळी, गुटखा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणी एकूण 171 आरोपींना तुरुंगाची हवा खायला पाठवले आहे.

सध्या आर्यन खान प्रकरणामुळे ड्रग्ज तस्करीची जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक विभागात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट मालेगावमध्ये सापडले. हे प्रकरणही जिल्ह्यात बरेच गाजले. आता उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या दीड महिन्यात ड्रग्ज तस्करांवर धडाकेबाज कारवाई केल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या दीड महिन्यात उत्तर महाराष्ट्रात आठ ठिकाणी गांजाची शेती नष्ट केली. विशेषतः नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात चोरून गांजाची शेती करणे सुरू होते. त्यात नंदुरबारमध्ये तर वनविभागाच्या जागेवर कब्जा करून हे उद्योग सुरू होते. येणाऱ्या काळात नाशिक, धुळे, नगर, नंदुरबार, जळगाव पोलीस अधीक्षकांना गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक असेल ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

साठेबाजांवर कारवाई

नाशिक ग्रामीणमध्ये रेशनच्या धान्याचा चोरटा व्यापार सुरू होता. त्यात साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. जळगावमधील धरणगावात असाच प्रकार सुरू होता. तिथे जवळपास पावणेतेरा लाखांचा गहू, तांदूळ जप्त केला. विविध ठिकाणच्या कारवाईत 5117 किलो गांजा जप्त करण्यात आला. सोबतच अर्धा किलो ब्राऊन शुगर, 481 ग्रॅम चरस, चार गाड्या, मोटारसायकल, मोबाईल असा एकूण साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. एकूण 31 प्रकरणांत कारवाई केली. त्यात 45 आरोपींना बेड्या ठोकल्या. अवैध गुटखा प्रकरणांत 37 कारवाया केल्यात. त्यात 64 आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यात 2 कोटी 27 लाख 37 हजार 302 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शेखर यांनी दिली.

कुख्यात सतनामसिंगला बेड्या

तरुणांना शस्त्रे पुरवून गुन्हेगारी विश्वात ढकलणाऱ्या सतनामसिंग या आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारवाईत 40 गावठी पिस्तुल, 84 काडतुसे, 2 मॅक्झिन, 65 तलवार, 8 कोयते, 1 गुप्ती, सत्तुर, चॉपर, चाकू आदी हत्यारे जप्त केलीयत. त्यात 60 गुन्ह्यांमध्ये 62 आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती शेखर यांनी दिली. यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जळगावचे प्रवीण मुंढे, अहमदनगरचे मनोज पाटील आदी उपस्थित होते.

इतर बातम्याः

मोहमयी सोनं होतंय स्वस्त, जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

नाशिककरांनो मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती करायची असल्यास ही कागपत्रे करा सादर!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली