बिल थकले म्हणून वीज कनेक्शन कापले, शेतीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवनच संपवले !

आठ दिवसापासून रोज जाधव शेतात जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला की नाही याची पाहणी करायचे. मात्र वीज पुरवठा सुरु न झाल्याने अखेर ते हताश झाले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

बिल थकले म्हणून वीज कनेक्शन कापले, शेतीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवनच संपवले !
शेतीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवनच संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 3:18 PM

अहमदनगर : आठ दिवसापासून वीज खंडित करण्यात आल्याने पिकाला पाणी कसे द्यायचे या विवंचनेतून एका शेतकऱ्याने गळफास गेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात उघडकीस आली आहे. पोपट जाधव असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती आणि पीककर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता वीज वितरण कंपनीमुळे शेतीला फटका बसत आहे.

आठ दिवसापासून वीज पुरवठा खंडित

नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट जाधव यांचे वीजबिल थकले होते. थकीत वीज बिल भरत नसल्याने वीज वितरण कंपनीने त्यांचा वीजपुरवठा बंद केला होता.

गेल्या आठ दिवसापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज नसल्याने शेतपिकाला पाणी देण्याचा मोठा प्रश्न जाधव यांच्यासमोर निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा

वीज नसल्याने विवंचनेत होते शेतकरी

मयत शेतकरी पोपट जाधव यांची शेती असून, शेतात गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर गव्हाच्या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. मात्र वीजच नसल्याने पिकाला पाणी द्यायचे कसे हा यक्षप्रश्न जाधव यांच्यासमोर उभा होता.

आठ दिवसापासून रोज जाधव शेतात जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला की नाही याची पाहणी करायचे. मात्र वीज पुरवठा सुरु न झाल्याने अखेर ते हताश झाले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

पिकाचे नुकसान होईल या विवंचनेतून टोकाचे पाऊल

पीकाला पाणी न मिळाल्यास पीकाचे नुकसान होईल, या विवंचनेतून त्यांनी आज पहाटेच्या सुमारास झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.