AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिल थकले म्हणून वीज कनेक्शन कापले, शेतीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवनच संपवले !

आठ दिवसापासून रोज जाधव शेतात जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला की नाही याची पाहणी करायचे. मात्र वीज पुरवठा सुरु न झाल्याने अखेर ते हताश झाले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

बिल थकले म्हणून वीज कनेक्शन कापले, शेतीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवनच संपवले !
शेतीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवनच संपवलेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Nov 28, 2022 | 3:18 PM
Share

अहमदनगर : आठ दिवसापासून वीज खंडित करण्यात आल्याने पिकाला पाणी कसे द्यायचे या विवंचनेतून एका शेतकऱ्याने गळफास गेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात उघडकीस आली आहे. पोपट जाधव असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती आणि पीककर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता वीज वितरण कंपनीमुळे शेतीला फटका बसत आहे.

आठ दिवसापासून वीज पुरवठा खंडित

नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट जाधव यांचे वीजबिल थकले होते. थकीत वीज बिल भरत नसल्याने वीज वितरण कंपनीने त्यांचा वीजपुरवठा बंद केला होता.

गेल्या आठ दिवसापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज नसल्याने शेतपिकाला पाणी देण्याचा मोठा प्रश्न जाधव यांच्यासमोर निर्माण झाला होता.

वीज नसल्याने विवंचनेत होते शेतकरी

मयत शेतकरी पोपट जाधव यांची शेती असून, शेतात गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर गव्हाच्या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. मात्र वीजच नसल्याने पिकाला पाणी द्यायचे कसे हा यक्षप्रश्न जाधव यांच्यासमोर उभा होता.

आठ दिवसापासून रोज जाधव शेतात जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला की नाही याची पाहणी करायचे. मात्र वीज पुरवठा सुरु न झाल्याने अखेर ते हताश झाले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

पिकाचे नुकसान होईल या विवंचनेतून टोकाचे पाऊल

पीकाला पाणी न मिळाल्यास पीकाचे नुकसान होईल, या विवंचनेतून त्यांनी आज पहाटेच्या सुमारास झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.