AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इथे बसू नका, निघून जा’ असे सांगितले; टोळक्याने थेट इसमालाच…

सोसायटीच्या मागील पडीक जागेत काही तरुण गैरकृत्य करत होते. एका व्यक्तीने तरुणांना हटकले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. यानंतर तरुणांनी जे केले त्याने सर्वच हादरले.

'इथे बसू नका, निघून जा' असे सांगितले; टोळक्याने थेट इसमालाच...
क्षुल्लक कारणातून टोळक्याने इसमाला संपवलेImage Credit source: TV9
| Updated on: May 01, 2023 | 3:11 PM
Share

अभिजीत पोते, पुणे : सोसायटीच्या मागील जागेत गैरकृत्य करत असलेल्या तरुणांना हटकल्याने टोळक्याने 50 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. रवींद्र गायकवाड असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोयत्याने वार करून गायकवाड यांची निर्घृण हत्या केली. पुण्यातील केशवनगर भागात ही घटना घडली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकत्र येऊन गायकवाड यांना मारहाण करत त्यांची हत्या केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय घडले नेमके?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र गायकवाड हे गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या जागेवर गेले असता, काही तरुण त्या ठिकाणी गैरकृत्य करत असल्याचे दिसून आले. याठिकाणी बसू नका आणि निघून जा, असे गायकवाड यांनी त्या तरुणांना सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून त्या तरुणांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली.

काही वेळाने ते तरुण आणखी काही साथीदारांना घेऊन आले आणि गायकवाड यांच्यावर कोयत्याने आणि इतर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा तत्पूर्वी मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात या परिसरातील सामान्य नागरिकांनी सर्व दुकानं बंद ठेऊन निषेध व्यक्त केला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.