AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोटो पाहा, अपघाताची दाहकता कळेल, पण कारमधील पाचही जण वाचलेत! कसे? वाचा

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खासगी कार उलटून भीषण अपघात

फोटो पाहा, अपघाताची दाहकता कळेल, पण कारमधील पाचही जण वाचलेत! कसे? वाचा
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 11, 2022 | 1:00 PM
Share

अहमदनगर : संगमनेर (Sangamner) तालुक्यातील जांभुळवाडी इथं भीषण अपघात (Ahmednagar Accident) घडला. पण अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली. विशेष म्हणजे जी खासगी कार (Car Accident) पूर्णपणे उलटली होती, त्यामध्ये पाच प्रवासी होते. हे पाचही प्रवासी अगदी थोडक्यात बचावलेत. दैव बलवत्तर म्हणून या सगळ्यांनी अगदी थोडक्यात मृत्यूला हुलकावणी दिलीय.

संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी इथं होंडा कंपनीच्या एका खासगी कारचा अपघात झाला. ही कार भरधाव वेगात होती. कार चालक वेगाने गाडी चालवत होता. पण हा वेगच त्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ ओढावली होती.

कार चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि अनर्थ घडला. कार रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. हा अपघात इतका जबर होता की गाडीची चारही चाकं वर आणि गाडीचं संपूर्ण छत शेतात, अशी अवस्था झाली होती. खाली डोकं वर पाय केल्याप्रमाणे या कारचा भीषण अपघात घडला होता.

या अपघातानंतर कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या कारमध्ये एकूण पाच जण होते. हे पाचही जण थोडक्याच वाचलेत. त्यातील काही जणांना किरकोळ दुखापत झालीय. तर काहींना जबर मार बसलाय. स्थानिकांनी या कारमधील प्रवाशांची मदत केली आणि जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

खरंतर गेल्या 48 तासांत राज्यात अपघातांची मालिका सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अमरावतीत एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघा दुचाकीस्वारांचा जागीच जीव गेलाय. तर नागपूर मुंबई महामार्गावरही ट्रकचा भीषण अपघात झाला.

नागपूर मुंबई महामार्गावर वाशिम जवळ झालेल्या अपघात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा ट्रक थेट एका कारवर कोसळला होता. पण सुदैवानं कारमधील प्रवाशी अगदी थोडक्यात वाचले होते.

राज्यातील रस्ते अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे आता चिंता वाढली आहे. वारंवार अतिवेग, ओव्हरटेकिंग, लेन कटिंग यामुळे अपघात होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी कडक शिस्त कशी लावली जाईल, या अनुषंगाने उपाययोजना करण्याचीही गरज व्यक्त करण्यात येतेय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.