AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्य दोनच घडीचं… बसमध्ये चढत असतानाच तो तिच्या मागून आला आणि काही क्षणात… लोकेश्वर असं का वागला?

तिरुपतीमधील एका दुःखद घटनेत, 35 वर्षीय उषा यांची त्यांच्या पती लोकेश्वरने हत्या केली आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. लग्नाच्या 15 वर्षांनंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. पत्नीवर संशय घेण्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. लोकेश्वरने योजनाबद्धपणे उषाची हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावला. या घटनेने परिसरात हळहळ पसरली आहे आणि पोलिस तपास करत आहेत.

आयुष्य दोनच घडीचं... बसमध्ये चढत असतानाच तो तिच्या मागून आला आणि काही क्षणात... लोकेश्वर असं का वागला?
लोकेश्वर असं का वागला?Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 21, 2025 | 2:15 PM
Share

आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी त्याच्या बायकोची हत्या केली. त्यानंतर त्यानेही जीव संपवला. त्यामुळे या परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने बायकोवर निर्दयपणे चाकू हल्ला केला. त्यात ती मरण पावली. आधी त्याने प्लान तयार केला. त्यानंतर हा हल्ला केला. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन तपास करत आहेत.

तिरुपती ग्रामीणच्या मंगलम येथील बोम्मला क्वार्टर येथे ही घटना घडली. 35 वर्षाच्या उषाचं नेल्लोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधर येथे राहणाऱ्या लोकेश्वरसोबत झालं होतं. त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. दोघांना दोन मुलेही आहेत. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण काही काळाने दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाले होते.

कारण आलं समोर

उषा ही करकंबाडी येथील अमरा राजा फॅक्ट्रीत काम करत होती. तर लोकेश्वर बीएसएनलमध्ये कॉन्ट्रॅक्ट टेक्निशियन होता. उषा आणि लोकेश्वरमध्ये वारंवार वाद व्हायचे. लोकेश्वर पत्नी उषावर संशय घ्यायचा. हेच त्यांच्या वादाचं मुख्य कारण होतं. गेल्या महिन्याच्या 30 तारखेला दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडणानंतर लोकेश्वर दोन्ही मुलांना घेऊन त्याच्या आईवडिलांकडे गेला होता.

चाकूने हल्ला

दोघेही वेगळं राहू लागल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर लोकेश्वरने उषाच्या हत्येचा प्लान तयार केला. उषाचा ऑपिसला जाण्या येण्याचा टाइम त्याला माहीत होता. 19 जुलै रोजी उषा पहाटे 5 वाजता ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली. ती कंपनीची बस पकड होती. इतक्यात लोकेश्वर पाठीमागून आला आणि त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. उषावर सपासप वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

स्वत:ही संपवलं

पोलिसांच्या मते, लोकेश्वरने हत्येची पूर्ण योजना आखली होती. त्याने आधी उषाचा येण्याची वाट पाहिली. उषा घरातून निघाली तेव्हा तो तिचा पाठलाग करत बसपर्यंत आला. त्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर लोकेश्वर थेट घरी गेला आणि त्याने गळफास लावून स्वत:लाही संपवलं. पत्नीला मारल्यानंतर त्यानेही जगाचा निरोप घेतला. आईवडिलांचं छत्र हरपल्याने मुलांचे रडून रडून हाल होत आहेत. तिरुचनूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चौकशी केली जात आहे. तसेच दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी तिरुपती रुईया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.