AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujrat : ग्रीष्मा हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, तालिबानी पद्धतीने हत्येने देश हादरलेला

गुजरातमधील सुरतमध्ये 12 फेब्रुवारीला जे काही घडले ते कधीही विसरता येणार नाही. ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हे हत्याकांड पाहिले, त्यांना त्या घटनेच्या भीषणतेत बरेच दिवस झोपही लागली नसेल. या देश हादरवून सोडलेल्या हत्याकांडात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Gujrat : ग्रीष्मा हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, तालिबानी पद्धतीने हत्येने देश हादरलेला
सुरत ग्रीष्मा हत्या प्रकरणImage Credit source: social
| Updated on: Feb 26, 2022 | 10:06 PM
Share

सुरतकाही महिन्यापूर्वी गुजरातमध्ये जी हत्या (Gujrat Girl Murder) झाली, ती देशाला हादरवून सोडणारी होती. असं म्हणतात की प्रेमाने मर्यादा ओलांडली तर माणूस काहीही करू शकतो. आणि प्रेम जर एकतर्फी असेल तर प्रेम करणारी व्यक्ती सर्वात मोठा गुन्हा करायलाही मागेपुढे पाहत नाही. त्याला ना पोलीस दिसत होते ना कायदा, ना कुटुंब. काही दिवसांपूर्वी गुजरातमधूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. जिथे एका मनोरुग्न प्रियकराने एकतर्फी प्रेमात वेडे (One Sided Love) होऊन रस्त्यावर एका मुलीची हत्या केली. तेही गर्दीसमोर. मारेकरी मुलीचा गळा चिरत होता आणि लोक तमाशा बघत राहिले. गुजरातमधील सुरतमध्ये 12 फेब्रुवारीला जे काही घडले ते कधीही विसरता येणार नाही. आणि ज्यांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, त्यांना त्या घटनेच्या दहशतीत बरेच दिवस झोपही लागली नसेल. ही काहणी आहे, ग्रीष्मा वेकारिया हत्याकांडाबद्दल (Grishma Vekariya Murder) . ग्रीष्माला मारणारा दुसरा कोणी नसून तिच्यासोबत शिकणारा तरुण होता. फेनिल पंकज गोयानी असे आरोपीचे नाव आहे. त्याने ग्रीष्माची निर्घृण हत्या तर केलीच, पण त्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअरही केला.

ज्या प्रकारे तिची सार्वजनिकरित्या हत्या करण्यात आली ते पाहून देश थक्क झाला. अनेकांची हृदय पिळवटून गेली, मुलींमध्ये या हत्येनंतर दहशतीचे वातावरण होते. ग्रीष्माच्या अंत्ययात्रेत गर्दी होती. कारण बरेच लोक त्यांच्या मुलीला, त्यांच्या बहिणीला ग्रीष्मात पाहत होते. यानंतर संतापाची लाट उसली होती, कारण हे तिच्याबाबतीत झालं ते कुणाच्याही बाबतीत होऊ शकते. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास सुरतमधील कामरेज भागात घडली, रचना सर्कलजवळ 20 वर्षीय फेनिल पंकज गोयानी याने 21 वर्षीय ग्रीष्माला सर्वांसमोर पकडले. त्याच्या हातात एक धारदार चाकू होता जो त्याने ग्रीष्माच्या मानेवर ठेवला होता. हा सर्व प्रकार ग्रीष्मच्या घराजवळ घडत होता, त्यामुळे आवाज ऐकून तिचे कुटुंबीयही बाहेर आले. तिला वाचवण्यासाठी धावले.

पण फेनिल सर्वांना धमकावत होता की दूर राहा नाहीतर तिचे डोके शरीरापासून वेगळे करेन. यादरम्यान शेकडो लोकांनी तिला घेराव घातला, मात्र कोणीही उष्मा वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ग्रीष्माचा भाऊ ध्रुव आणि काका सुभाष तिला वाचवण्यासाठी पुढे गेल्यावर फेनिलने चाकूने वार करून जखमी केले. ध्रुवच्या डोक्यावर तर फेनिलने काकांच्या पोटात वार केले. यावेळी लोकांची गर्दी जमल्याचे या घटनेच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते. मात्र कोणीही मदतीसाठी पुढे येत नाही. जखमी झाल्यानंतर ग्रीष्माचा भाऊ ध्रुव लोकांना वाचवण्याची विनंती करत होता, मात्र असे करण्याऐवजी लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले. दरम्यान, त्याने त्याच धारदार चाकूने ग्रीष्माचा गळा चिरला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सुरत रेंजचे आयजी राजकुमार पांडियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या हत्येप्रकरणी 2500 पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. ज्यामध्ये 190 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या तपासातील विशेष बाब म्हणजे एकाही साक्षीदाराला किंवा प्रत्यक्षदर्शीला पोलिस ठाण्यात बोलावले नाही, तर त्याच्या घरी जाऊन पोलिसांचे जबाब नोंदवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल, चौकशी समितीच्या अहवालात नेमकं काय म्हटलं?

पोलीसच निघाले खंडणीखोर, महिन्याला मागितली तब्बल एवढी रक्कम, आता जेलची हवा

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.