AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

या आंदोलनात आंदोलनकांनी महावितरण अधिकाऱ्याच्या टेबला वर साप सोडल्याने खळबळ माजली होती. यावरून आता या कार्यकर्त्यांच्या अडचणी मोठ्या वाढल्या आहेत. कारण आता यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
महावितरणाची आंदोलकांविरोधात तक्रार
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 9:27 PM
Share

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवासापासून वीज पुरवठ्यावरून आणि वीज तोडणीवरून (Electricity bill recovery) शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही (Swabhimani Shetkari Sanghatana) मैदानात उतरत जोरदार आंदोलन केले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली होती. असेच आंदोलन इचलकरंजीत करण्यात आले होते. मात्र या आंदोलनात आंदोलनकांनी महावितरण अधिकाऱ्याच्या टेबला वर साप सोडल्याने खळबळ माजली होती. यावरून आता या कार्यकर्त्यांच्या अडचणी मोठ्या वाढल्या आहेत. कारण आता यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरीही यावरून आक्रमक होण्याची जास्त शक्यता आहे.

तिघांना न्यायालयाने कोठडी दिली

या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकारी प्रशांत राठी यांच्या टेबलवर साप सोडल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिवसा लाईट मिळावी यासाठी आंदोलन केले होते. यात अभिषेक पाटील आणि आणखी दोघांवर हा गुन्हा दाखल झालाय. या तिघांवर गुन्हा दाखल झाला असल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिनासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

स्वाभिमानी आक्रमक होण्याची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू आहे. ही वीजबिल वसुली अशाप्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. अशाप्रकारे ऊस बिलातून शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुली होणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातही जोरदार आंदोलन झाले होते. त्यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवताना राजू शेट्टी दिसून आले होते. या सरकारला शेतकऱ्यांची काही काळजी नाही, हे सरकार बेईमानांचे सरकार आहे, असे राजू शेट्टी म्हणाले होते. वीज तोडणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेली पिकं करपत आहेत.

मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोल

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढणार? बच्चूभाऊ विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश!

गरज पडल्यास उद्धव ठाकरेंना ‘त्या’ होर्डिंग्जची आठवण करून देईन: महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज

Follow Us
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.