AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana : केळी निर्यात लांबणीवर, आता दरावर काय होणार परिणाम?

केळीचा हंगाम सुरु होताच दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. असे असले तरी आता निर्यातीमध्ये अडचण निर्माण झाल्याने याचा दरावर काय परिणाम याची धास्ती केळी उत्पादकांना आहे. वातावरणातील बदलाचा केळीचे नुकसान झाले आहे. यातच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने निर्यातीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पण याचा केळी दरावर परिणाम होणार नसल्याचे निर्यातीदारांकडून सांगण्यात आले आहे.

Banana : केळी निर्यात लांबणीवर, आता दरावर काय होणार परिणाम?
थंडीत वाढ झाल्याने निर्यातही लांबवणीवर पडत आहे. पण मागणी अधिक असल्याने याचा दरावर काही परिणाम होणार नाही
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 26, 2022 | 4:35 PM
Share

जळगाव : (Banana Season)केळीचा हंगाम सुरु होताच दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. असे असले तरी आता निर्यातीमध्ये अडचण निर्माण झाल्याने याचा दरावर काय परिणाम याची धास्ती केळी उत्पादकांना आहे. वातावरणातील बदलाचा केळीचे नुकसान झाले आहे. यातच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने (Banana Export) निर्यातीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पण याचा केळी (Banana Rate) दरावर परिणाम होणार नसल्याचे निर्यातीदारांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा वातावरणातील बदल आणि अंतिम टप्प्यात वाढेलेली थंडी यामुळे दराबाबत साशंका निर्माण होत होती पण आता वाढत्या तापमानामुळे दरात वाढ होत आहे तर दुसरीकडे केळी पिकवण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याने निर्यात ही महिनाभर लांबणीवर पडणार आहे.

खानदेशात केळीवर करप्याचा प्रादुर्भाव

निसर्गाच्या लहरीपणाचा फळपिकांवरच अधिक झाला आहे. हंगामातील पिकांचे तर नुकसान झाले पण गेल्या अनेक वर्षापासून बागांची जोपासणा करुनही अंतिम टप्प्याते नुकासनीचा सामना करावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला होता. त्यामुळे जालना, औरंगाबाद जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी बागांची मोडणी केली होती. या नैसर्गिक समस्यांचा सामना करुनही केळीच्या काढणीला सुरवात झाली आहे. पण बागांना चिलिंग म्हणजेच काळे डाग लागल्याने निर्यातीमध्ये अडचण निर्माण होत आहे.

महिन्याभराने निर्यात लांबणीवर

थंडी कमी होताच केळीच्या दरात सुधारणा होऊ लागली होती. 400 ते 600 रुपये क्विंटल दराने केळीला मागणी होती. मध्यंतरीच्या वाढत्या दरामुळे हा परिणाम झाला होता. पण फेब्रुवारी महिना उजाडताच उन्हामध्ये वाढ सुरु झाली आणि दरात सुधारणा होऊ लागली होती. 400 ते 600 रुपयांवरील केळी थेट 1 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेली आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून निर्यात होईल अशी अपेक्षा होती पण केळी बागांना चिलिंग इंज्युरीने ग्रासलेले आहे. त्यामुळे आता 15 मार्चपासून निर्यात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. असे असले तरी दरावर त्याचा परिणाम होणार नाही.

कमी कालावधीत अधिकची निर्यात

यंदा महिन्याभराने केळीची निर्यात लांबणीवर पडणार असली तरी त्याचा दरावर परिणाम होणार नाही. मागणीत वाढ असल्याने ही परिणाम दिसून येणार नाही. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत झाल्याने निर्यातीमधील अडचणी दूर झाली आहे. त्यामुळे जळगावमधील रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर या भागातील केळी दर्जेदार असल्याने कमी कालावधीत अधिक निर्यात होईल असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!

यंदाचं काय घेऊन बसलावं, 4 वर्षापूर्वीच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत गंगाखेडचे शेतकरी, आता उपोषणाचे अस्त्र

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली