AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले

दराच्या चढ-उताराबाबत कांदा हेच लहरी पीक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. एका रात्रीतून कांद्याचे दर वाढतात किंवा कवडीमोल होतात. त्यावरुनच त्याची विक्री करण्याची सुत्रे ठरतात. पण हेच सोयाबीनबाबत झाले तर. अहो झाले तर काय झालेच आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात जी सुधारणा झाली होती ती संपूर्ण हंगामात पाहायली मिळाली नाही. पण दर वाढण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी गेला आणि दर घसरण्यासाठी एक रात्र जावी लागली.

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले
सोयाबीनचे दर स्थिर असले तरी आवक मात्र सुरुच आहे.
| Updated on: Feb 26, 2022 | 2:09 PM
Share

लातूर : दराच्या चढ-उताराबाबत कांदा हेच लहरी पीक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. एका रात्रीतून (Onion Rate) कांद्याचे दर वाढतात किंवा कवडीमोल होतात. त्यावरुनच त्याची विक्री करण्याची सुत्रे ठरतात. पण हेच (Soybean Rate) सोयाबीनबाबत झाले तर. अहो झाले तर काय झालेच आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात जी सुधारणा झाली होती ती संपूर्ण हंगामात पाहायली मिळाली नाही. पण दर वाढण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी गेला आणि दर घसरण्यासाठी एक रात्र जावी लागली. 7 हजार 300 रुपयांवर गेलेले सोयाबीन आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 6 हजार 900 वरच येऊन ठेपले आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी जे अपेक्षित होते ते सर्वकाही रात्रीतून कवडीमोल झाले आहे. आता पुन्हा शेतकऱ्यांकडेपुढे एकच प्रश्न आहे. तो म्हणजे सोयाबीनची विक्री की साठवणूक?

आठ दिवासांमध्ये कसे झाले दरात बदल?

15 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन हे 6 हजार 300 वर स्थिर होते. तर लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 10 ते 12 पोत्यांची आवक सुरु होती. शेतकऱ्यांना अपेक्षित नाही पण सरासरीप्रमाणे दर मिळत असल्याने आवकमध्ये वाढ होत होती. 17 फेब्रुवारीपासून दिवसाला 50 ते 100 रुपायंनी दर वाढण्यास सुरवात झाली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये 6 हजार 700 वर असलेले सोयाबीन गुरुवारी 7 हजार 350 वर पोहचले होते. आता दरात कायम वाढ होत राहणार असाच सर्वांचा समज झाला होता. त्यामुळे व्यापारी देखील शेतकऱ्यांना साठवणूकीचा सल्ला देत होते. पण शुक्रावारी दर स्थिर राहिले आणि शनिवारी तर यामध्ये 400 रुपायांची घट झाली आहे.

मोजक्याच शेतकऱ्यांची चांदी

गेल्या आठ दिवासांपासून ज्या प्रमाणात सोयाबीनचे दर वाढत होते त्यानुसार ही वाढ अणखीन आठ दिवस राहणार असल्याचे सांगितले जात होते. शिवाय दर घटले तरी 50 100 रुपये प्रतिक्विंटल मागे कमी होतील असे गणित शेतकऱ्यांचे होते. पण एका रात्रीतून 400 रुपायांची घसरण झाली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या तीन दिवसांमध्ये ज्यांनी सोयाबीनची विक्री केली त्यांनाच अधिकचा फायदा झाला आहे.

आता पुढे काय?

सोयाबीनच्या दरात एवढ्या कमी वेळेत एवढे मोठे बदल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे. फायदा आणि नुकसान कमी प्रमाणात झाले तरी चालेल पण टप्प्याटप्प्याने विक्री हेच महत्वाचे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?

कांद्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कोण खातयं ‘भाव’? नव्याने आवक अन् विक्रमी दरही

तूर खरेदी केंद्र : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खरेदी केंद्रावर विक्री सोडा नोंदणीही नाही, नेमके कारण काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.