AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत.उत्पादन वाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल त्याने स्वीकारला आहेच पण जी करार शेती स्वप्नवत होती त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ लागली आहे. असाच एक प्रयोग जिल्ह्यातील शिराढोण सारख्या खेडेगावात शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे घटते उत्पादन यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट आयुर्वेदिक औंषध कंपनीशी करार केला.

Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!
औषधी चिया बियाणांचे क्षेत्र मराठवाड्यात वाढत आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 26, 2022 | 3:57 PM
Share

उस्मानाबाद : शेतकऱ्यांनी (Traditional farming) पारंपरिक शेतीच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत.उत्पादन वाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल त्याने स्वीकारला आहेच पण जी करार शेती स्वप्नवत होती त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ लागली आहे. असाच एक प्रयोग जिल्ह्यातील शिराढोण सारख्या खेडेगावात शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा आणि त्यामुळे घटते उत्पादन यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट (Ayurvedic medicines) आयुर्वेदिक औंषध कंपनीशी करार केला. एक नाही गावातील 20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा अनोखा उपक्रम केला होता. ज्या चियांची अधिकची मागणी आहे त्याचीच शेतकऱ्यांनी लागवड करुन आता त्याचा पूरवठा थेट तृप्ती हर्बल औषध कपनीला केला जाणार आहे.

काय होते आणि काय झाले?

मराठवाड्यातील शेतकरी म्हणलं की खरीप आणि रब्बी हे दोन हंगामाच समोर येतात. मात्र, गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील असमतोल यामुळे वर्षभर कष्ट करुनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही ही मराठवाड्यातील स्थिती आहे. त्याचप्रमाणे कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरीही रब्बी हंगामात गहू, हरभऱा आणि ज्वारीचे उत्पादन घेत होते. मात्र, यामुळे पिकांवर केलेला खर्चही पदरी पडत नाही शिवाय मेहनत वायाच अशीच अवस्था. त्यामुळे या गावच्या 20 शेतकऱ्यांनी एकत्र येत अनोखा उपक्रम राबवला. 20 शेतकऱ्यांनी एकत्र येत तृप्ती हर्बल या आयुर्वेदिक औषेध कंपनीशी करार करुन तब्बल 24 एकरात चिया तर 4 एकरात अश्वगंधाची लागवड केली आहे.

10 हजाराच्या बदल्यात सर्वकाही

औषध कंपनीच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी चिया आणि अश्वगंधाचे उत्पादन घेण्याचे ठरवले. तर कंपनीनेही रीतसर करारात प्रत्येक शेतकऱ्याकडून 10 हजार रुपये जमा करुन घेत पेरणीसाठी लागणारे बियाणे, जैविक औषधे, खतांचा पुरवठा एवढेच काय शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळावे म्हणून मार्गदर्शनही केले. आता निघालेले उत्पादन हे कंपनी मार्फत विकले जाणार आहे. शेतकऱ्यांचे क्षेत्र आणि सर्वकाही औषध कंपनीचे या माध्यमातून शिरढोण येथील 20 शेतकऱ्यांनी अनोखा उपक्रम समोर ठेवला आहे.

शिराढोणचे हे आहेत बहाद्दर शेतकरी

पीक पध्दतीमधील बदल यापुढे एक पाऊल टाकत शिराढोण येथील नामदेव माकोडे, सुदर्शन माकोडे, सविश खोत, अरुण कणसे, रणजित परदेशी, कल्पेश परदेशी, संजय यादव पाटील, रत्नदीप यादव, बालाजी गुमाणे, आरफात डांगे यांनी हा उपक्रम राबवला आहे. सध्या दोन्ही औषध उत्पादने बहरात आहेत. यामधून शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढ तर होणार आहे पण आगामी काळात या पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

यंदाचं काय घेऊन बसलावं, 4 वर्षापूर्वीच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत गंगाखेडचे शेतकरी, आता उपोषणाचे अस्त्र

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले

E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली