AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट कार आणि मालवाहू ट्रकची धडक झाली, या अपघतामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू
AccidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 25, 2026 | 8:49 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट कार आणि मालवाहू ट्रकची धडक झाली, या अपघतामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक 6 वर्षांचा मुलगा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात होते, खंडाळ्याकडे निघाले असतानाच वाटेतच त्यांना मृत्यूनं गाठलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या  श्रीरामपूर तालुक्यात खंडाळा गावाजवळ हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्व जण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात होते, याचदरम्यान श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला, या अपघतामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे.  खंडाळ्याकडे निघाले असतानाच वाटेतच त्यांना मृत्यूनं गाठलं आहे. खंडाळा गावाच्या जवळ हा अपघात झाला आहे. तर एक 6 वर्षांचा मुलगा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळीच 5 जणांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. ट्रक आणि कारची भीषण धडक झाली,  हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच  जाग्यावर 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर या अपघातामध्ये जखमी असलेल्या एका 6 वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

अपघाताचं कारण अस्पष्ट 

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? अपघाताचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकनेलं नाहीये, मात्र चालकाचं वहानावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे, या अपघातामध्ये 6 जणांनी आपला जीव गमावला आहे.

मृतांची नावं 

प्रशांत रमेश चव्हाण (वय 24)

संगीता अनिल चव्हाण (वय 40)

सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय 16)

सारिका अनिल चव्हाण (वय 30)

ऋत्वी अशोक चव्हाण (वय 3)

ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय 26)

जखमी

रुद्र अशोक चव्हाण (वय 6)

मुंबई महापालिका 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार!
मुंबई महापालिका 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार!.
महिला डब्यात चढणाऱ्या तरुणीला केस ओढून बाहेर काढलं! लोकलमधील प्रकार
महिला डब्यात चढणाऱ्या तरुणीला केस ओढून बाहेर काढलं! लोकलमधील प्रकार.
गर्भलिंगचाचणीच्या प्रश्नावरून आव्हाडांनी सभागृहात मांडला प्रस्ताव
गर्भलिंगचाचणीच्या प्रश्नावरून आव्हाडांनी सभागृहात मांडला प्रस्ताव.
कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या! वडेट्टीवारांचा मोठा दावा
कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या! वडेट्टीवारांचा मोठा दावा.
एफआयआर करण्यापासून आम्हाला का थांबवलं? रोहित पवारांचा सवाल
एफआयआर करण्यापासून आम्हाला का थांबवलं? रोहित पवारांचा सवाल.
रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल; काय घडलं?
रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल; काय घडलं?.
कांद्याचे भाव घसरले! आक्रमक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले
कांद्याचे भाव घसरले! आक्रमक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार.
नायडूंना पदावर राहण्याचा अधिकार नाही! रोहित पवारांची टीका
नायडूंना पदावर राहण्याचा अधिकार नाही! रोहित पवारांची टीका.
दादर स्टेशनवरील 'चालता-फिरता इंडिकेटर'! प्रवाशांसाठी निस्वार्थ सेवा
दादर स्टेशनवरील 'चालता-फिरता इंडिकेटर'! प्रवाशांसाठी निस्वार्थ सेवा.