मुलगीच बापासाठी काळ ठरली, असं काय घडलं की पोटच्या मुलीनंच टोकाचं पाऊल उचललं?

आईचे निधन झाले होते. वडिलच दोन्ही भूमिका पार पाडत मुलांचा सांभाळ करत होते. मग असं काय घडलं की मुलीने टोकाचा निर्णय घेतला.

मुलगीच बापासाठी काळ ठरली, असं काय घडलं की पोटच्या मुलीनंच टोकाचं पाऊल उचललं?
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
| Updated on: Jun 22, 2023 | 4:46 PM

जांजगीर चांपा : छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच जन्मदात्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिलडा नेवरा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. मयताचा मुलगा अल्बर्ट भारती याने पोलिसांना वडिलांच्या हत्येची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्देनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. पोलिसांनी भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. कल्पना भारती असे आरोपी मुलीचे नाव आहे.

पोलीस चौकशीत मुलीची कबुली

पीडित मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यामुळे घरी वडील आणि 9 बहिणी, एक भाऊ असा परिवार होता. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मयताच्या मुलांकडे याबाबत चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान तिसरी मुलगी कल्पना भारती घाबरली होती. पोलिसांना तिच्यावर संशय आला. महिला पोलिसाने मुलीला ताब्यात घेत चौकशी केली असता मुलीने गुन्ह्याची कबुली दिली.

…म्हणून वडिलांची हत्या केली

वडील घाणेरड्या नजरेने पहायचे आणि स्पर्श करायचे. वडिलांचे हे वागणे मुलीला पसंत नव्हते. यावरुन वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. यातूनच मुलीला संताप अनावर झाला आणि काठीने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.