AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा नवरा नसलेला बरा…, बसमध्ये बसलेली बायको ढसाढसा रडली, एक उचकी आणि संपलं आयुष्य, ‘त्या’ 1 मिनिटांत काय घडलं?

Crime: नवऱ्याकडून विश्वासघात, बसमध्ये बसलेल्या बायकोला उचकी आली आणि संपलं तिचं आयुष्य, शेवटचे 'ते' तीन शब्द बेतले जीवावावर... जाणून तुम्हाला देखील बसेल मोठा धक्का.. या प्रकरणामुळे महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

असा नवरा नसलेला बरा..., बसमध्ये बसलेली बायको ढसाढसा रडली, एक उचकी आणि संपलं आयुष्य, 'त्या' 1 मिनिटांत काय घडलं?
फाईल फोटो
| Updated on: Aug 28, 2025 | 10:27 AM
Share

Crime: बाकोला एक उचकी आणि बसमध्येच तिचं आयुष्य संपलं… अशात त्या महिलेसोबत काय झालं असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. महिलेला एक फोन आला आणि महिलेच्या कानावर पडलेल्या त्या तीन शब्दांमुळे महिलंचं निधन झालं… संबंधित घटना दिल्ली येथील हरदोई येथे घडली आहे. एका महिलेचं चालत्या बसमध्ये निधन झालं. महिलेला एक फोन आला आणि फोनवर जे काही संभाषण झालं ते ऐकल्यानंतर तिचं निधन झालं. फोनवर बोलणं झाल्यानंतर महिला ढसाढसा रडु लागली. अशात तिच्या आईने काय झालं विचारलं. तेव्हा महिला म्हणाली, ‘नवऱ्याच्या फोनवरून एक महिलेने फोन केला आणि मला म्हणाली तुझी सवत बोलतेय…’ हे तीन शब्द ऐकताच महिलेला उचकी आणि तिचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव रिता असं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. महिलेची आई गुड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दीड वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मुलीचं लग्न सीतापूर येथील मछरेहटा येथे केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर तिली टीबीचा आजार असल्याचं निदान झालं. त्यामुळे नवऱ्यानं तिला माहेरी सोडलं, पण उपचारानंतर पुन्हा समज घालून मुलीच्या संसाराची घडी बसवून दिली.’

2024 मध्येच रिता हिच्या वडिलांचे देखील निधन झालं आहे. तेव्हा देखील रिता माहेरी आली होती. तेव्हा देखील रिता आणि तिच्या पतीमध्ये वाद झाले होते. तेव्हा सुद्धा रिता हिला माहेरी सोडून तिचा नवरा निघून गेला होता. अशात रिता देखील आई आणि भावासोबत दिल्लीत आली.

आई गुड्डी यांनी घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली आहे. रिता हिच्या नवऱ्याच्या फोनवरून एका महिलेने तिला फोन केला. तेव्हा रिता आणि आई बसमध्ये होते. पतीचा फोन म्हणून रिता हिने फोन रिसीव्ह केला. तेव्हा तिच्या कावावर असं काही आली, ज्यामुळे ती ढसाढसा रडू लागली…

पुढे आईने लेकीला विचारलं काय झालं. तेव्हा रिता रडत म्हणाली, एका महिलेचा फोन होता, म्हणाली, ‘तुझी सवत बोलतेय… आता सासरी कधीच येऊ नकोस…’ हे सांगताना रिता हिला एक उचकी आली आणि तिचं निधन झालं… आता रिता हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.