AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा चौकशी कशासाठी होणार? स्वतः एकनाथ खडसे यांनी सांगितलं कारण…

एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये आहे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पुन्हा चौकशी कशासाठी होणार? स्वतः एकनाथ खडसे यांनी सांगितलं कारण...
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 22, 2022 | 8:22 PM
Share

अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : भोसरी एमआयडीसी भूखंड (Bhosari MIDC Plot) घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांची पुन्हा चौकशी होणार असल्याने त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर एकनाथ खडसे म्हणाले, भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न आहे. नाथाभाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात, आत्तापर्यन्त चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे, सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर असल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे. एकूणच खडसे यांनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असतांनाच या चौकशा सुरू झाल्या होत्या, त्यात मात्र नंतरच्या काळात एकनाथ खडसे यांना अटक होईल अशी चर्चा देखील होती, मात्र खडसे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने अटकेची कारवाई टळली होती.

एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये आहे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, पुन्हा राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांची पुन्हा दिवाळीनंतर चौकशी होणार असल्याने निवडणुका जिंकण्यासाठीच मला अडकवले जात असल्याचा निष्कर्ष खडसे यांनी काढला आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर पुणे येथील बंड गार्डन पोलीस ठाण्यात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता, त्याच प्रकरणी तक्रारदार यांच्या अर्जात ज्या मागण्या केल्या होत्या त्याची चौकशी न झाल्याचा आक्षेप तक्रारदार यांनी घेतला आहे.

त्यावरून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना दिले असून दिवाळीनंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.