AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram buying center : नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र सुरू

मागच्या काही दिवसात अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतीचं आतोनात नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल अधिकाऱ्यांनी आणि काही मंत्र्यांनी केली आहे.

Gram buying center : नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र सुरू
Gram buying centerImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 25, 2023 | 12:09 PM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र (Gram buying center) सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नाव नोंदणीही करण्यात येत असून, हरभरा खरेदीसाठी नंदुरबार आणि शहादा अशी दोन केंद्र ठेवण्यात आली आहेत. नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. शहादा (shahada) खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्याचं समोर आला आहे. बाजार समितीत शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडं हरभरा विक्रीस प्राधान्य देत आहे.

खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य

राज्य शासनाच्यावतीने नाफेड मार्फेत हरभरा खरेदी सुरू झाली असली, तरी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीस प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजार समिती बीकेव्हीटू या वाणाला सात हजार दोनशे ते सात हजार आठशेपर्यंत तर मेक्सिकन वाणाला दहा हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. गावरानी स्थानिक वाणाला चार हजार आठशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिकेही टू या वाणाची लागवड होत असते आणि या वाणाला शासनाचा हमीभावापेक्षा जास्त दर आहे. नाफेडने हरभरा खरेदी केल्यानंतरही शेतकऱ्यांना हरभरा विक्रीच्या पैशासाठी आठ ते पंधरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागते असा मागील वर्षाचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी यावेळी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य दिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मागच्या काही दिवसात अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतीचं आतोनात नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल अधिकाऱ्यांनी आणि काही मंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी सरकारची काय मदत मिळणार याकडे डोळे लावून बसले आहेत. त्याचबरोबर राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पीक काढण्याचं काम सुरु आहे.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.