AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यानंतर हा अपघातही चर्चेत, चार जणांच्या मृत्यूनंतर आरोपींना अटक का नाही? राजकीय दबावाचा आरोप

Accident news: पुण्याच्या आणि जळगावच्या घटनेचा विचार केला तर दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आहे. मात्र आपण जळगावच्या अपघातानंतर सर्वात आधी ३०४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे एका आरोपीला लोकांकडून जास्त मार लागला.

पुण्यानंतर हा अपघातही चर्चेत, चार जणांच्या मृत्यूनंतर आरोपींना अटक का नाही? राजकीय दबावाचा आरोप
जळगाव अपघाताबाबत गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
| Updated on: May 23, 2024 | 12:20 PM
Share

पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कारने दुचाकीवर असणाऱ्या दोन जणांना उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चर्चा आता राज्यात नाही देशात होऊ लागली आहे. या प्रकरणात राजकीय दबावाचा आरोप झाला होता. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात ७ मे रोजी अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होतो. या प्रकरणात आरोपींना अजूनही अटक नाही. चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही या घटनेतील आरोपींना अटक होत असल्याने राजकीय दबाव असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला होता. त्यावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिला आहे.

दोन्ही घटनांमध्ये साम्य पण..

पुण्याच्या आणि जळगावच्या घटनेचा विचार केला तर दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आहे. मात्र आपण जळगावच्या अपघातानंतर सर्वात आधी ३०४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे एका आरोपीला लोकांकडून जास्त मार लागला. त्यानंतर उपचाराची आवश्यकता असल्यामुळे मेडिकल फिटनेस नसल्यामुळे अटक करता येत नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, दोषींवर कारवाई करावी असे आदेश आपण पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत त्याचा अहवाल लवकर येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी मला दिला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

अपघात झाला त्या दिवशी मृतांच्या नातेवाईकांचा संपर्कात होतो. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाले, त्या दिवशी जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. अपघाताबाबत जे सर्वोच्च कलम असते ते म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि माझा काही एक संबंध नाही. जे जे करता येत ते सर्व करण्याचा आपण प्रयत्न केला, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

आरोपींना यामुळे अटक नाही…

आरोपी माझे नातेवाईक नाही. मात्र ज्या चार जणांचा मृत्यू झाला ते माझ्या मतदारसंघातले आहेत. त्यामुळे या प्रकरणात शेवटपर्यंत मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न करत राहणार आहे. वैद्यकीय कारणामुळे आरोपींना अटक करता येत नव्हती. मात्र तरीसुद्धा आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत आदेश मी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.