AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये तृतीयपंथी चोरांची टोळी सक्रिय, गणेशोत्सवानिमित्त घरात नाचत दागिन्यांचीच चोरी

कल्याण-डोंबिवली परिसरात तृतीयपंथी चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. गणेश उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांच्या घरात ही टोळी खुलेआम शिरून गणपतीच्या मूर्तीसमोर नाचत, नजर चुकवत लाखोंचे दागिने लंपास करत आहे.

कल्याणमध्ये तृतीयपंथी चोरांची  टोळी सक्रिय, गणेशोत्सवानिमित्त घरात नाचत दागिन्यांचीच चोरी
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 14, 2024 | 1:06 PM
Share

कल्याण-डोंबिवली परिसरात तृतीयपंथी चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. गणेश उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांच्या घरात ही टोळी खुलेआम शिरून गणपतीच्या मूर्तीसमोर नाचत, नजर चुकवत लाखोंचे दागिने लंपास करत आहे. विशेष म्हणजे दागिने पळवल्यावर ते घरच्यांकडून पैशांची मागणी देखील करत आहेत. असाच एक प्रकार कल्याणच्या वाडेघर परिसरात सुरेंद्र चंद्रकांत पाटील या व्यापाऱ्याच्या घरात घडला आहे. तृतीयपंथियाच्या टोळीने पाटील यांच्या घरात शिरून त्यांची पत्नी आणि आईचे तब्बल 15 तोळ्याचे 2,40,000 रुपये किमतीचे दोन सोन्याच्या गंठण लंपास केले. विशेष म्हणजे या टोळीने सोन्याचे दागिने लंपास केल्यानंतरही दोन हजारांची मागणी केली.आणि पैसे रोख घेऊन बिनधास्तपणे ते घरातून बाहेर पडले. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

कल्याणच्या वाडेघर परिसरात 8 तारखेला साडेअकरा वाजता एक धक्कादायक घटना घडली. सुरेंद्र चंद्रकांत पाटील यांच्या घरात पाच तृतीयपंथी व्यक्तींनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पैसे मागण्याच्या बहाण्याने जबरदस्ती प्रवेश केला आणि मोठी चोरी केली. पाटील यांच्या आईने स्वतःच्या आणि सुनेच्या सोन्याच्या गंठणांची पिशवीत ठेवून गणपतीच्या बाजूला ठेवले होते. त्यानंतर, घरातील कचरा टाकण्यासाठी त्या बाहेर गेल्या, त्याचवेळी पाच तृतीयपंथी घरात घुसले. गणपतीच्या सणाचे कारण देत त्यांनी पाटील यांच्या घरात पैसे मागायला सुरुवात केली. त्या पाच जणांपैकी एकाने, संधीचा फायदा घेत सोफ्यावर ठेवलेली पिशवी उचलून 15 तोळ्याच्या सोन्याच्या दोन गंठणांची चोरी केली, ज्याची किंमत सुमारे 2,40,000 रुपये आहे. इतकेच नव्हे, या तृतीयपंथींनी घरच्यांकडून 2000 रुपयांची मागणी केली आणि अखेर 200 रुपये घेऊन सर्वांसमोरच पळ काढला.थोड्या वेळात चोरी झाल्याचे घरच्यांच्या लक्षात आले, आणि त्यांनी तत्काळ कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या खडकपाडा पोलीस या पाचही तृतीयपंथी व्यक्तींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घेत आहेत.

बोरिवली पश्चिम येथे गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांवर चाकूने हल्ला

बोरिवली पश्चिम येथे गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. काल रात्री गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांवर चाकू हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरिवली पश्चिम येथील नंदनवन सोसायटीजवळ गणपती विसर्जनासाठी जात असताना भांडण झाले आणि एका व्यक्तीने गणपती मंडळाच्या दोन जणांवर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर गणपती मंडळाच्या लोकांनी तक्रार देण्यासाठी MHB पोलिस स्टेशन गाठले. सध्या बोरिवली पश्चिम एमएचबी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?