AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यक्रमासाठी घरी आला अन् घात झाला, भावाच्या वियोगाने बहीण शोकाकुल, कल्याणात काय घडलं ?

आयुष्याचा काहीच भरोसा देता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ते मुंबईपासून हाकेच्या अतंरावर असलेल्या कल्याणातील एक घटनेमुळे. बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी आलेला भाऊ हसतखेळत बोलला, सगळ्यांची ख्याली खुशाली विचारली. पण थोड्याच वेळात...

कार्यक्रमासाठी घरी आला अन् घात झाला, भावाच्या वियोगाने बहीण शोकाकुल, कल्याणात काय घडलं ?
प्रातिनिधक फोटोImage Credit source: social media
| Updated on: Apr 07, 2025 | 8:30 AM
Share

आपलं आयुष्य किती क्षणभंगुर आहे, याचा प्रत्यय बऱ्याच वेळा लोकांना येत असतो. सगळेजण आज मेहनत करत, उद्याची स्वप्न रंगवत असतात, चांगल्या भविष्यासाठी धडपडत असतात, पण उद्याचा दिवस दिसेल की नाही अशी परिस्थितीही काही वेळी उद्भवते. एका क्षणात होत्याचं नव्हतं ते होतं आणि हाती उरतं ते फक्त दु:ख.. आयुष्याचा काहीच भरोसा देता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ते मुंबईपासून हाकेच्या अतंरावर असलेल्या कल्याणातील एक घटनेमुळे. बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी आलेला भाऊ हसतखेळत बोलला, सगळ्यांची ख्याली खुशाली विचारली. सगळीकडे चांगलं, आनंदाचं वातावरण होतं, पण थोड्याच वेळात त्याच भावाच्या वियोगामुळे बहिणीवर दु:खाचा डोंगर कोसळला आणि ती शोकविव्हल झाली. कल्याणातील त्या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

बहिणीकडे आलेला तरुण कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेला आणि…

बहिणीकडे कार्यक्रमासाठी आलेल्या भावाचा अकस्मात मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील रायते पुलाजवळ काल दुपारी उल्हास नदीत पाय घसरून पडल्याने एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाऊसाहेब बारस्कर असे मृत तरूणाचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच हादरले आहेत.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, मृत तरूण भाऊसाहेब हा कल्याणातील त्याच्या बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी रायते येथे आला होता. दुपारच्या सुमारास तो बहिणीसोबत नदीकाठी कपडे धुण्यास गेला असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. यामुळे प्रचंड कोलाहल माजला, पण त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर टिटवाळा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर साडेपाचच्या सुमारास भाऊसाहेब याचता मृतदेह हाती लागला.टिटवाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहे. बहिणीकडे आलेल्या भावाच दुर्दैवी अंत झाल्यामुयले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.