AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरावर मोठा डल्ला मारला, चोरीनंतर एकटाच फिरत राहिला, पण ‘इन्स्टाग्राम’मुळे पकडला गेला अतिशहाणा चोर !

ज्या घरात अनेक वर्ष काम केलं तिथेच चोरी करत मोठा डल्ला मारला आणि आरोपी बाहेर फिरायलाही गेला. मात्र त्याच्या इन्स्ट्गारम अकाऊंटमुळे तो पकडला गेला आणि पोलिसांनी त्याची रवानगी तुरूंगात केली.

घरावर मोठा डल्ला मारला, चोरीनंतर एकटाच फिरत राहिला, पण 'इन्स्टाग्राम'मुळे पकडला गेला अतिशहाणा चोर !
कर्ज फेडण्यासाठी बाईक चोरी करणारा चोरटा अटक
| Updated on: Aug 18, 2023 | 10:19 AM
Share

नवी दिल्ली | 18ऑगस्ट 2023 : गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी अतिआत्मविश्वासाच्या भरात तो अशी एखादी चूक करतोच ज्यामुळे त्याचा गुन्हा उघड होतोच. असं काहीसं प्रकरण समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी पंजाबच्या लुधियाना मध्ये कोट्यावधींची रोकड चोरणारी मुख्य आरोपी अवघ्या 10 रुपयांच्या फ्रुटीच्या नादात पकडली गेली होतं.

तशीच एक केस समोर आली आहे, जिथे चोर (thief) त्याच्याच अतिशहाणपणामुळे पकडला गेला होता. आरोपी इसम एका महिलेच्या घरी काम करत होता, त्याने तिच्याकडेच चोरी केली आणि फिरायला गेला. पण इन्स्टाग्राममुळे (Instagram) त्याची चोरी पकडली गेली व पोलिसांनी त्याला अटक केली.

60 वर्षीय महिलेकडे काम करणाऱ्या 29 वर्षीय संजीवने लाखो रुपयांचे दागिने चोरून एकट्याने देशातील हिल स्टेशनवर जाण्याची योजना आखली होती. अवघ्या आठवड्याभरात आरोपीने जवळपास अर्धा डझन ठिकाणी जाऊन तेथील व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोडही केली. मात्र, दिल्ली पोलिसही आपल्या अकाऊंटवर नजर ठेवून आहेत, याचा त्याला सुगावाही लागला नाही. फॉलोअर्सना आपली माहिती देणेच त्याला महागात पडले आणि त्याच्या अटकेसाठी कारणीभूतही ठरले.

11 जुलै रोजी उत्तम नगर भागातील दाल मिल रोडवर चोरीची घटना घडली. आपल्या घरातून किमान 12 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार एका वृद्ध महिलेने नोंदवली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पथकही तयार करण्यात आले.

पोलिसांची आरोपीवर सतत होती नजर

“पोलिसांच्या पथकाने याप्रकरणाचा तपास सुरू करत चोरी झालेल्या ठिकाणाचे तसेच आसपासच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यादरम्यान एका फुटेजमध्ये संशयित संजीव हा पीडितेच्या घरातून घाईघाईने जाताना दिसला. त्यानंतप पोलिसांनी संजयच्या फोनवर पाळत ठेवली. आरोपी हा गेल्या तीन वर्षांपासून पीडित महिलेच्या आईच्या घरी काम करत होता. तसेच त्यांची छोटी-मोठी कामेही करायचा.

वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी चोरी केल्यानंतर आरोपी गोल्ड लोनच्या एका दुकानात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर समजले. त्याने तेथे सुरक्षेच्या कारणास्तव सोन्याच्या दोन अंगठ्या आणि 20 हजार रुपये ठेवले होते. त्यानंतर आरोपी सतत त्याच्या जागा बदलत एकटाच फिरत होता. प्रथम तो हरिद्वारला जाऊन एक दिवस राहिला, नंतर हृषीकेशमध्येही एक दिवसासाठी मुक्काम केला. नंतर तो बद्रीनाथला रवाना झाला आणि तिथे तीन-चार दिवस राहिला. नंतर बसने तो उत्तराखंडमधील चमोवी येथे पोहोचला. तेथून विमानाने त्याने थेट केरळ गाठलं. मात्र या सर्व जागांबद्दल तो इन्स्टाग्राम वरील स्टोरीजमध्ये माहिती देत होता.

इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे जवळपास 100 फॉलोअर्स आहेत. त्याच्या पोस्ट्सवर पोलिस सतत लक्ष ठेवून होते. हा आरोप फरार आहे आणि तो तिथे त्यांच्या हॉटेलमध्ये राहू शकतो, याची कल्पना पोलिसांनी आधीच उत्तराखंडच्या हॉटेल असोसिएशनला दिली होती. चोरीच्या घटनेनंतर तो एकटाच बाहेर फिरायला गेला आणि इन्स्ट्ग्राम स्टोरीमुळे पकडला गेला, असे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.