AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुन्या वादाचा राग मनात ठेऊन तरूणाची 9 जणांकडून हत्या, अवघ्या 48 तासांत छडा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र जीव मुठीत धरून जगत आहेत. चोरी, दरोडा, खून , हत्या या गुन्ह्यांनी राज्य हादरलं असून राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जुन्या वादाचा राग मनात ठेऊन तरूणाची  9 जणांकडून हत्या, अवघ्या 48 तासांत छडा
क्राईम न्यूज
| Updated on: Oct 25, 2024 | 8:18 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक मात्र जीव मुठीत धरून जगत आहेत. चोरी, दरोडा, खून , हत्या या गुन्ह्यांनी राज्य हादरलं असून राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खेड परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत तपास करून अवघ्या 48 तासांत या गुन्ह्यामागच्या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. घोटी पोलीस स्टेशन आणि नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या हत्येमागचं कारण ऐकून पोलीसही हादरलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 ते 3 वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग या टोळक्याच्या मनात धुमसत होता. त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केला. समाधान आगीवले असे मृत तरूणाचे नाव असून त्याच्या शरीरात चाकू भोसकूव त्याची हत्या करण्यात आली. समाधान आणि आरोपींचा दोन-तीन वर्षांपूर्वी शाळेवरून काही वाद झाला होता. त्यानंतर समाधान तो विसरून गेला. मात्र त्या टोळक्याने हा राग मनातच ठेवला आणि संधी मिळताच इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खेड परिसरात समाधानचा खून केला. 9 जणांना मिळून त्याच्यावर हल्ला करत त्याला संपवलं. यामुळे प्रचंड खळबळ माजली होती.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घोटी पोलीस स्टेशन आणि नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासलं तसेच खबऱ्यांकडून त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आता गुन्हेगारांचा शोध लावला. पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील विविध गावातून नऊ जणांना ताब्यात घेतल आहे. मात्र या प्रकरणामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.