जेवण करायला नकार दिला म्हणून पत्नीची हत्या! झोपेतच पतीने पत्नीला…

सोमवारी रात्री उशिरा राम सिंह घरी आला, तेव्हा त्याने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितलं. पत्नीने काहीच जेवण न केल्याचं राम सिंहला सांगितलं. यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. भांडणानंतर अखेर उषा देवी झोपण्यासाठी गेली. पत्नी झोपल्यानंतर पती राम सिंह याने डाव साधला.

जेवण करायला नकार दिला म्हणून पत्नीची हत्या! झोपेतच पतीने पत्नीला...
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 1:45 PM

नवरा बायकोमधील (Husband Wife fight) शुल्लक भांडणं हिंसा आणि हत्येपर्यंत (Murder News) जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देहरादूनमध्ये एक पतीने आपल्या पत्नीची हत्या (Wife killed by husband) केली. या हत्येमागचं कारण हादरवणारं आहे. पत्नीने रात्रीचं जेवण करण्यास नकार दिला म्हणून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी अटकही केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या आरोपीचं वय हे तब्बल 72 वर्ष आहे. आरोपीने आपल्या 53 वर्षांच्या पत्नीची सोमवारी हत्या केली.

नेमकी कुठे घडली घटना?

देहरादूनमधील दलनवाला येथे हा खळबळजनक प्रकार घडला. अटक करण्यात आरोपीचं नाव राम सिंग असं आहे. त्याने पत्नी उषा देवी हीची हत्या केली. राम सिंग हा एक फास्टफुडचा स्टॉल चालवण्याचं काम करतो. हत्येपासून वाचण्यासाठी त्याने एक बनाव रचला होता. राम सिंहने आपल्या पत्नीला बॅटने जबर मारहाण केली होती. यात पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या पत्नीला उपचारासाठी घेऊन जायचा विचार त्याच्या मनात आला.

राम सिंह यांने रुग्णालयात फोन करुन रुग्णवाहिका बोलावली. पत्नी शिडीवरुन पडून जखमी झाल्याचं त्यांनं सांगितलं. पण दुर्दैवाने रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर राम सिंहची पत्नी उषा देवी यांना मृत घोषित करण्यात आलं. अखेर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान पोलिसांना राम सिंहवर संशय आला. म्हणून त्यांनी राम सिंह याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या फेरतपासणीत राम सिंह यानेच पत्नीची हत्या केल्याचं उघड झालंय.

हे सुद्धा वाचा

पाहा LIVE घडामोडी : Video

2 वर्षांचा संसार उद्ध्वस्त

73 वर्षीय राम सिंहने दोन वर्ष आधीच उषा देवीसोबत लग्न केलं होतं. गंभीर आजारामुळे राम सिंहच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. तसंच मुलांचाही मृत्यू झाला होता. उषा देवीसोबत लग्न केल्यानं राम सिंह आपल्या 14 वर्षीय नातवासोबत राहत होते.

राम सिंह याने पत्नी झोपेत असताना तिच्यावर क्रिकेट बॅटने हल्ला केला. या हल्ला इतका जबर होता, की त्यात पत्नी उषा देवी ठार झाली. सोमवारी रात्री उशिरा राम सिंह घरी आला, तेव्हा त्याने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितलं. पत्नीने काहीच जेवण न केल्याचं राम सिंहला सांगितलं. यानंतर दोघांमध्ये भांडण झालं.

भांडणानंतर अखेर उषा देवी झोपण्यासाठी गेली. पत्नी झोपल्यानंतर पती राम सिंह याने डाव साधला आणि तिचा जीव घेतला. उषा देवी ही देहरादूनमधील कुख्यात कुख्यात गुंड करन शिवपुरी याची आई होती, अशीही माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलीय.

पोलिसांना आता आरोपी राम सिंह याला अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. दरम्यान, वर्षभरापुरी पुण्यात एक महिलेनं पती घरी पाणीपुरी घेऊन आला म्हणून आत्महत्या केली होती. घरी जेवण करुनही पती बाहेरुन पाणी पुरी घेऊन आल्यानं पुण्यातील महिलेन आपलं आयुष्य संपवलं होतं. दरम्यान, आता पत्नीनं जेवण केलं नाही, म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची घडना उघडकीस आल्यानं खळबळ उडालीय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.