AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिमुरडीला घरी घेऊन जाताना त्यांच्या मनात नको ते आलं, पण आईने तात्काळ धाव घेतली म्हणून…

महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. अशीच एक हादरवून करणारी घटना उघडकीस आली आहे.

चिमुरडीला घरी घेऊन जाताना त्यांच्या मनात नको ते आलं, पण आईने तात्काळ धाव घेतली म्हणून...
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्याकडून विनयभंगImage Credit source: TV9
| Updated on: May 09, 2023 | 5:52 PM
Share

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात बलात्कारांच्या घटना वाढत असताना आता अल्पवयीन मुलींची छेड काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. डोंबिवलीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्यानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी सायंकाळी पिडीत मुलीची आई ही शेजाऱ्यांकडे गेली होती. यावेळी आईने मुलाला आणि मुलीला तुम्ही मागून या, असे सांगितले. मग भाऊ आपल्या बहिणीला घेऊन जात असतानाच आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला हात पकडून घरी आणले. ही बाब लगेच मुलाने आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने त्वरीत घराकडे धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा हा उघडा होता तर आरोपीच्या घराचा दरवाजा बंद असल्याने तिने ठोठावला. त्यानंतर त्यांच्या मुलीने रडत रडत घराचा दरवाजा उघडला.

आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

आईने मुलीला घरात नेऊन तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काही झाले का? याची विचारणा केली. पिडीत मुलीने आरोपीने केलेल्या विनयभंगाबाबत आईला सविस्तर सांगितले. यानंतर आईने रामनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.द.वि कलम 354 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आशा निकम आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.