AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील पाणी कपात महिलेच्या जीवावर बेतली, नवऱ्याला अंघोळीला विरोध करताच चाकूने… काय घडलं साकीनाक्यात ?

पावसाळा तोंडावर आला तरी राज्यासह मुंबईतही सध्या पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सध्या पाणीकपात सुरू हेच कारण एका महिलेच्या जीवावर बेतलं. पाणी संकटामुळे मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेचा जीव जाता जाता राहिला.

मुंबईतील पाणी कपात महिलेच्या जीवावर बेतली, नवऱ्याला अंघोळीला विरोध करताच चाकूने... काय घडलं साकीनाक्यात ?
| Updated on: Jun 03, 2024 | 12:13 PM
Share

पावसाळा तोंडावर आला तरी राज्यासह मुंबईतही सध्या पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सध्या पाणीकपात सुरू हेच कारण एका महिलेच्या जीवावर बेतलं. पाणी संकटामुळे मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेचा जीव जाता जाता राहिला. पाणी कपातीमुळे पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असून यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पती परमात्मा गुप्ता (वय 42) याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निर्घृण हल्ल्यामध्ये मीरा गुप्ता नावाची महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नवऱ्याला अंघोळीला विरोध केला अन्

मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाणीकपात सुरू आहे. सर्वांच्याच घरात पाण्याचे वांदे होत आहेत, मात्र तेच कारण एका महिलेच्या जीवासाठी घातक ठरले. पालिकेने पाणीकपात केल्याने मीरा गुप्ता यांच्या घरातही पाणी कमी होते. शनिवारी दुपारी त्यांचे पती परमात्मा गुप्ता (वय 42) हे घरी आले. त्यांना अंघोळीला जायचं होतं. मात्र पालिकेने पाणीकपात केल्याने तसेच घरात पाणी कमी असल्याने पत्नी मीरा यांनी त्यांना अंघोळ करू नका असे सांगत विरोध दर्शवला. मात्र यामुळे परमात्मा गुप्ता संतापले आणि त्यांनी पत्नीवर हल्ला केला. स्वयंपाक घरातील कांदा चिरण्याचा चाकू घेऊन त्यांनी मीरा यांच्या पोटा सपासप तीन वार केले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिस घटनास्थलू पोहोचले आणि त्यांनी परमात्मा गुप्ता यांना अटक केली. त्यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाढदिवसाला केक उशिरा आणला म्हणून पतीचा पत्नी आणि मुलावर चाकू हल्ला

दरम्यान मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. वाढदिवसाला केक उशिरा आणला म्हणून पतीने त्याची पत्नी आणि मुलावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपी पती राजेंद्र शिंदे फरार झाले असून साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवसाला केक उशीरा आणला म्हणून आरोपी राजेंद्र शिंदे संतापले. त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर हल्ला चढवला. पत्नीच्या मनगटावर तर मुलाच्या पोटात आणि छातीत चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवरही राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी राजेंद्र शिंदे फरार असून साकानीका पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Follow Us
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट