AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरण, चौथ्या मृतदेहाची ओळख पटली !

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत आरपीएफ एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.

Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरण, चौथ्या मृतदेहाची ओळख पटली !
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील चौथ्या मृतदेहाची ओळख पटलीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 02, 2023 | 9:49 AM
Share

मुंबई / 2 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या ASI सह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. यातील तिसऱ्या प्रवाशाचीही ओळख पटली आहे. तिसरा मयत प्रवासी हा हैदराबाद येथील रहिवासी आहे. सय्यद सैफुद्दीन तिसऱ्या मयत प्रवाशाचे नाव आहे. मृतक एमआयएमशी संबंधित असल्याची माहिती मिळते. सय्यदचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले असून, मृतदेह हैदराबादला नेण्यात येणार आहे. सय्यद हे अजमेर शरीफहून परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. अखेर तिसऱ्या प्रवाशाची ओळख पटवण्यास यश आले आहे.

अजमेर शरीफहून परतत होते

सय्यद यांचे कुटुंब मुळचे कर्नाटकातील बिदरमधील रहिवासी असून, कामानिमित्त ते गेल्या 15 वर्षांपासून हैदराबाद येथे राहतात. सय्यद यांचे हैदराबाद येथे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. ते राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रवास करत होते. सय्यद यांना तीन मुली आहेत. सय्यद यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

हा दहशतवादी हल्ला – वारीस पठाण

दरम्यान, सय्यद यांच्या तिन्ही मुलींना 25 लाख रुपये द्यावी अशी मागणी कुटुंबासह हैदराबादचे आमदार जाफर हुसेन यांनी केली आहे. तर हा दहशतवादी हल्ला आहे, आरोपीचे मोबाईल आणि गॅझेट तपासा अशी मागणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.