AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : पतीसोबत चाललेल्या महिलेची तिघांकडून छेडछाड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

महिलेची छेडछाडीची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mumbai Crime : पतीसोबत चाललेल्या महिलेची तिघांकडून छेडछाड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबईत महिलेची छेडछाडImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 28, 2023 | 11:46 AM
Share

मुंबई / 28 जुलै 2023 : विक्रोळी परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास आपल्या पतीसोबत कारने चाललेल्या एका महिलेची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या तीन आरोपींनी महिलेची छेडछाड केली. विशेष म्हणजे घटनेला 10 उलटले तरी आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. अखेर पीडितेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर छेडछाडीचा व्हिडिओ शेअर करत आपल्यासोबत घडलेली आपबीती आणि पोलिसांची भूमिका याबाबत सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडिओ पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित महिला 16 जुलै रोजी पतीसोबत कारने विक्रोळी पार्कसाईटजवळून चालली होती. यावेळी दुचाकीवरुन चाललेल्या तिघा आरोपींनी महिलेची छेडछाड काढली. याप्रकरणी महिलेने आधी विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत टिळक नगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. टिळकनग पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेची तक्रार नोंदवून घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. पोलिसांनी 4 तास वाट पहायला लावत अखेर पहाटे 3 वाजता तक्रार नोंदवून घेतली.

तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस महिलेच्या पतीला गस्ती वाहनातून घटनास्थळ दाखवण्यासाठी घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा व्ही पी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले. यानंतर महिलेने अनेक वेळा व्ही पी नगर पोलिसांकडे तक्रार घेऊन गेली. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. दहा उलटून गेले तरी या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी पोस्ट केली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.