AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात का झाला? कारण शोधून काढण्यासाठी पोलीस करणार ‘असा’ तपास

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी भीषण कार अपघातात मृत्यू झाला. ते अहमदाबादहून मुंबईकडे परतत होते. तेव्हा पालघरजवळ त्याच्या कारचा अपघात झाला. एका मर्सिडीज कारने ते प्रवास करत होते.

सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात का झाला? कारण शोधून काढण्यासाठी पोलीस करणार 'असा' तपास
सायरस मिस्त्री आणि त्यांची अपघातग्रस्त कारImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 05, 2022 | 6:28 AM
Share

मुंबई : सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Accident News) अपघातप्रकरणी मोठी अपडेट हाती येते आहे. सायरस मिस्त्री यांचा रविवारी (4 ऑगस्ट) कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर आता पोलीसांकडून अपघाताची चौकशी केली जाते आहे. अपघाताच्या मुळाशी जात, नेमकं अपघाताचं कारण काय होतं?, याचा तपास पोलिसांकडून (Police investigation) केला जाणार आहे. याच तपासासाठी पोलिसांकडून एनजीओची मदत घेतली जाणार आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा अभ्यास करणाऱ्या एनजीओच्या मदतीने पोलीस पुढील तपास करणार आहेत. यात सीसीटीव्ही फुटेज (Cyrus Mistry car accident CCTV Video), कार चालकाची चौकशी इतर बाबीही तपासल्या जातील.

विशेष एनजीओची मदत

महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा विशेष एनजीओच्या मदतीने सखोल अभ्यास केला जातो. यात अपघाताचं कारण तर शोधलं जातंच. शिवाय पुन्हा असा अपघात होणार नाही, यासाठी काय करायला हवं, यावरही भर दिला जातो. आता पोलिसांकडून या एनजीओच्या मदतीने अपघाताच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यातून या अपघाताचं मूळ कारण काय, याचा शोघ घेतला जाईल.

आजपासून तपासाला सुरुवात

एक एनजीओतील तज्ज्ञ मंडळी पोलिसांसमोर या तपासात आजपासून सहभागी होतील. पोलिस आणि एनजीओतील लोक मिळून सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताची चौकशी आणि अभ्यास करतील. या चौकशीदरम्यान वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास केला जाणार आहे. कारचा अपघात का झाला, कसा झाला, अपघातात नेमकी चूक कुणाची होती? हा अपघात टाळता येणं शक्य होतं की नव्हतं?, अशा पैलूंवर तपास केला जाईल.

रस्ते अपघातांची चिंता

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी भीषण कार अपघातात मृत्यू झाला. ते अहमदाबादहून मुंबईकडे परतत होते. तेव्हा पालघरजवळ त्याच्या कारचा अपघात झाला. एका मर्सिडीज कारने ते प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चार जणांपेकी दोघांचा मृत्यू झालास तर दोघेजण गंभीर जखमी झाले. सध्या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे रस्ते अपघातांत होणाऱ्या मृत्यूच्या घटनांना प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचाही कार अपघातात मृत्यू झाला होता. पहाटेच्या सुमारास विनायक मेटे यांची कार मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघातग्रस्त झाली होती.

Follow Us
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा
खरात फाईलमुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकतं, संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.