AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : पत्रा चाळ घोटाळा! संजय राऊतांना दिलासा नाहीच, ईडी कोठडीत पुन्हा वाढ! 19 सप्टेंबरपर्यंत मुक्काम कोठडीतच

Sanjay Raut ED Arrest : ईडीने केलेल्या मागणीनुसार संजय राऊतांची कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आलीय. मुंबईच्या गोरेगाव येथील पत्रा चाळीच्या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे.

Sanjay Raut : पत्रा चाळ घोटाळा! संजय राऊतांना दिलासा नाहीच, ईडी कोठडीत पुन्हा वाढ! 19 सप्टेंबरपर्यंत मुक्काम कोठडीतच
संजय राऊतImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Sep 05, 2022 | 1:40 PM
Share

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ईडी कोठडीत (Sanjay Raut ED News) वाढ करण्यात आलीय. 14 दिवसांनी संजय राऊत यांची ईडी कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम 19 सप्टेंबरपर्यंत लांबला आहे. पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक (ED Arrest) केली होती. त्यानंतर संजय राऊतांच्या ईडी कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याचं पाहायल मिळालंय. 1 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. आता महिला उलटून गेला, तरी संजय राऊत हे कोठडीत आहेत.

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडीत पाठण्यात आलं होतं. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी पाच सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. या कोठडीत वाढ केली जावी, अशी मागणी ईडीने केली होती. ईडीने केलेल्या मागणीनुसार संजय राऊतांची कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आलीय. मुंबईच्या गोरेगाव येथील पत्रा चाळीच्या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या आरोपाखाली संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पाहा LIVE Update :

आपल्यावर करण्यात आलेले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचे सर्व आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले होते. संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय राऊत यांच्यावर सहआरोपी प्रवीण राऊत यांच्यासोबत कांदिवलीतील पत्रा चाळ पुनर्विकास योजने पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाखाली त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

ईडीने सुरुवातीला संजय राऊत यांच्या परिवाराला पत्राचाळ प्रकरणी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातून 1.06 कोटी रुपयांचा लाभ झाल्याचा आरोप केला होता. पण नंतर हाच आकडा वाढून राऊत कुटुंबीयांना 2.25 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष फायदा झाल्याचा आरोप ईडीकडू करण्यात आला. दुसरीकडे राऊत कुटुंबीयांकडून हे आरोप फेटाळण्यात आलेत.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......