AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धरणाच्या गेटजवळ कारमध्ये बसून गटारी साजरी करत होते, दरवाजे उघडले अन् कारसह पाच जणांचे जे झाले ते…

Mumbai Crime News: कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण कारने गेले होते. हे मित्र ३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली कारमध्ये बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडले.

धरणाच्या गेटजवळ कारमध्ये बसून गटारी साजरी करत होते, दरवाजे उघडले अन् कारसह पाच जणांचे जे झाले ते...
धरणाच्या पाण्यात कार वाहून गेली
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 04, 2024 | 7:39 AM
Share

श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात मासांहारी जेवण आणि मद्यपान अनेक जण करत नाही. त्यामुळे त्यापूर्वी येणाऱ्या गटारी अमावस्याला पार्टी केली जाते. परंतु हीच दारू पार्टी जीवावर बेतल्याची खळबळकनक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात घडली आहे. या घटनेत पाच जण कारसह वाहून जात होते. त्यातील तिघांनी उड्या मारल्या. परंतु दोन जणांचा मृत्यू झाला. गटारी साजरी करणे त्यांच्या जीवावरच बेतले.

कसा घडला प्रकार

धक्कादायक बाब म्हणजे पाच मित्र कारबसून धरणाच्या मुख्य प्रवाह असलेल्या गेटजवळ गटारीची पार्टी करत होते. त्याच सुमाराला अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते. त्यापैकी एकाच मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला तर दुसरा बेपत्ता झाला तर तीन कारमधून उड्या मारून वाहत्या प्रवाहामधून बचावले आहेत. गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण) असे या दुघटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अचानक दरवाजे उघडले अन्…

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने त्यातच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी गटारी साजरी करण्यासाठी हजरो पर्यटक निर्सगाच्या सानिध्यात पार्टीसाठी येतात. कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण कारने गेले होते. हे मित्र ३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली कारमध्ये बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडले.

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते. या पैकी तिघांनी कार बाहेर उड्या मारल्याने बचावले. मात्र दोन जण गाडीत अडकले होते. या पैकी गणपत चिमाजी शेलकंदे याचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. मात्र एकजण आद्यप ही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.

Follow Us
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...