AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांग्लादेशी मुस्लिम महिला हिंदू पुरुषांना कसं टार्गेट करतात? मुंबईत इंटरनॅशनल रॅकेटचा पदार्फाश

मुंबई क्राइम ब्रांचने एका मोठ्या इंटरनॅशनल रॅकेटचा पदार्फाश केलाय. बांग्लादेशी मुस्लिम महिला हिंदू पुरुषांना कसं टार्गेट करतात? त्यांच्या टॅक्टिक्स काय असतात? याचा खुलासा मंजू शर्मा या महिलेच्या चौकशीतून झालाय.

बांग्लादेशी मुस्लिम महिला हिंदू पुरुषांना कसं टार्गेट करतात? मुंबईत इंटरनॅशनल रॅकेटचा पदार्फाश
bangladeshi muslim women
| Updated on: Aug 14, 2025 | 12:34 PM
Share

मुंबई क्राइम ब्रांचने अलीकडेच एक महिलेला अटक केली. मंजू शर्मा ऊर्फ अल्ताफ शेख असं या महिलेच नाव आहे. ही महिला बेकायदरित्या बांग्लादेशातून भारतात दाखल झालेली. तिच्या चौकशीतून एका मोठ्या नेटवर्कचा खुलासा झाला आहे. बऱ्याच वर्षांपासून बनावट भारतीय ओळखपत्र तयार करुन परदेशी नागरिकांना भारतात वसवण्याच काम हे नेटवर्क करत होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, अल्ताफने सांगितलं की, बांग्लादेशी नागरिक सर्वप्रथम एजंट्सच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये जन्माचा बनावट दाखल बनवतात. त्या आधारावर आधार कार्ड बनवलं जातं. कागदपत्र हाती आल्यानंतर या घुसखोरांना भारताच्या वेगवेगळ्या शहरात पाठवलं जातं. इथे ते आपली ओळख लपवून सर्वसामान्यांमध्ये मिसळून जातात.

प्रेम जाळ्यात फसवून विवाह करणं हा सुद्धा या टोळीच्या रणनितीचा भाग आहे असं सूत्रांनी सांगितलं. अल्ताफ शेखने मान्य केलं की, महिला घुसखोर खासकरुन हिंदू पुरुषांना टार्गेट करतात. पुरुष घुसखोर कायमस्वरुपी देशात राहण्यासाठी हिंदू मुलींशी लग्न करण्याचा प्रयत्न करतात.

दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर त्यांनी…

अल्ताफ शेखने स्वत: सुद्धा असं करण्याचा प्रयत्न केला. आधी ती पश्चिम बंगालमार्गे भारतात घुसली. खोटी कागदपत्र तयार केली आणि मग मुंबईत येऊन पुरुषोत्तम प्रसाद शर्मा यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यानंतर ती मंजू शर्मा नावाने अनेक वर्षांपासून भारतात राहत होती.

मुंबई पोलिसांनी किती हजार बांग्लादेशी नागरिकांना परत पाठवून दिलय?

पुरुषोत्तमने बनावट कागदपत्रांच्या आधारे तिचं आधार कार्ड बनवलं. मुंबईत क्राइम ब्रांचने 3 ऑगस्ट 2025 रोजी अल्ताफ आणि तिच्या पतीला अटक केली. हे रॅकेट देशातील अन्य भागातही पसरलं असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. मागच्या तीन महिन्यात मुंबई पोलिसांनी जवळपास 1000 बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं आहे. ही संख्या सतत वाढत आहे. प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. या टोळीशी संबंधित अजूनही अन्य नावं पुढे येण्याचा पोलिसांना संशय आहे.

Follow Us
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.