AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलवर गेम खेळण्यास आई वडिलांची मनाई, 16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या

भंडारा शहराला लागून वाहत असेलल्या वैनगंगा नदीत उडी घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. (Bhandara Girl Suicide Mobile Game)

मोबाईलवर गेम खेळण्यास आई वडिलांची मनाई, 16 वर्षीय तरुणीची नदीत उडी घेत आत्महत्या
मोबाईल खेळण्यास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
| Updated on: May 28, 2021 | 10:24 AM
Share

भंडारा : आई वडिलांची मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्यामुळे 16 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात अल्पवयीन तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेत आयुष्याची अखेर केली. नदीत तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Bhandara Minor Girl commits Suicide after Parents Denies to play Mobile Game)

मोबाईलवर गेम खेळण्यास पालकांचा नकार

भंडारा शहराला लागून वाहत असेलल्या वैनगंगा नदीत उडी घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्डमध्ये संबंधित कुटुंब राहतं. मयत तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची इच्छा असताना आई वडिलांनी मात्र नकार दिला.

वैनगंगा नदीत तरुणीची उडी

आई वडिलांनी केलेल्या मनाईमुळे तरुणीला राग आला. तिने थेट शहराजवळून वाहत असलेल्या वैनगंगा नदीचे तीर गाठले. रागाच्या भरात नदीत उडी घेत तिने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

तासाभराने मृतदेह सापडला

तरुणीला नदीत उडी घेताना काही जणांनी पाहिले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली. एका तासानंतर नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनमाडमध्ये तरुणीची आत्महत्या

दरम्यान, ऑनलाईन शिक्षणात येत असलेल्या अडथळ्यांच्या परिणामांना घाबरुन बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गेल्या वर्षी मनमाडमध्ये घडली होती. घरात एकच मोबाईल आणि तीन भावंडे शिकणारे आहेत. कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला आहे. मात्र एकच मोबाईल असल्याने विद्यार्थिनीला अभ्यास करण्यासाठी मोबाईल मिळत नसे. त्यामुळे आपला अभ्यास अपूर्ण राहील या भीतीने तिने विष पिऊन आत्महत्येचे पाऊल उचलले होते.

संबंधित बातम्या :

घरात तीन भावंडं, एकच मोबाईल, अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, पुरंदरमधील धक्कादायक घटना

(Bhandara Minor Girl commits Suicide after Parents Denies to play Mobile Game)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.