AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्नितांडवात वाचले मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी प्रवाशाचा दुर्दवी मृत्यू

नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातातील मृत्यूच्या संख्या 13 वर गेली आहे.

अग्नितांडवात वाचले मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी प्रवाशाचा दुर्दवी मृत्यू
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 24, 2022 | 2:39 PM
Share

Nashik Bus Accident : नाशिकच्या ( Nashik) मिर्ची हॉटेल चौफुलीवर खाजगी बस आणि ट्रकमध्ये (Bus-Truck Accidnet) झालेल्या अपघातात 12 जणांचा (Accident Death) होरपळून मृत्यू झाला होता. याशिवाय 31 प्रवासी जखमी झाले होते त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील होरपळून जखमी झालेले साहेबराव जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. साहेबराव जाधव हे पन्नास वर्षांचे होते. नाशिकच्या औरंगाबाद रोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीवर 8 तारखेला पहाटे पाच वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. चालकासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये मयत साहेबराव जाधव यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सुरुवातीला उपचार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते.

नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातातील मृत्यूच्या संख्या 13 वर गेली आहे.

सुरुवातीला पहिल्याच दिवशी 12 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, त्यात डीएनए चाचणी करून अनेक मयतांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले होते.

बस अपघातानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी येऊन पाहणी केली होती, त्यावेळी राज्य सरकारनने मयतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर केंद्र सरकारने दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.

याशिवाय प्रशासनाच्या सर्व विभागांची बैठक घेत, अपघात घडू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

बस अपघातानंतर बस आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, बस अपघाताची चौकशी आडगाव ठाण्याचे पोलीस करीत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.