AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्नितांडवात वाचले मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी प्रवाशाचा दुर्दवी मृत्यू

नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातातील मृत्यूच्या संख्या 13 वर गेली आहे.

अग्नितांडवात वाचले मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी प्रवाशाचा दुर्दवी मृत्यू
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 24, 2022 | 2:39 PM
Share

Nashik Bus Accident : नाशिकच्या ( Nashik) मिर्ची हॉटेल चौफुलीवर खाजगी बस आणि ट्रकमध्ये (Bus-Truck Accidnet) झालेल्या अपघातात 12 जणांचा (Accident Death) होरपळून मृत्यू झाला होता. याशिवाय 31 प्रवासी जखमी झाले होते त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील होरपळून जखमी झालेले साहेबराव जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. साहेबराव जाधव हे पन्नास वर्षांचे होते. नाशिकच्या औरंगाबाद रोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीवर 8 तारखेला पहाटे पाच वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. चालकासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये मयत साहेबराव जाधव यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सुरुवातीला उपचार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते.

नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातातील मृत्यूच्या संख्या 13 वर गेली आहे.

सुरुवातीला पहिल्याच दिवशी 12 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, त्यात डीएनए चाचणी करून अनेक मयतांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले होते.

बस अपघातानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी येऊन पाहणी केली होती, त्यावेळी राज्य सरकारनने मयतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर केंद्र सरकारने दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.

याशिवाय प्रशासनाच्या सर्व विभागांची बैठक घेत, अपघात घडू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

बस अपघातानंतर बस आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, बस अपघाताची चौकशी आडगाव ठाण्याचे पोलीस करीत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.