AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Firing : किरकोळ वादातून गोळीबार! मालेगावच्या अल्लामा पुलावर थरार, गुन्हा दाखल

Malegaon Crime News : याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आता कारवाई काय होते, याकडे संपूर्ण मालेगावमधील जनतेचं लक्ष लागलंय.

Malegaon Firing : किरकोळ वादातून गोळीबार! मालेगावच्या अल्लामा पुलावर थरार, गुन्हा दाखल
मालेगावात खळबळImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 07, 2022 | 7:44 AM
Share

मालेगाव : मालेगाव (Malegaon News) शहरात गोळीबाराच्या (Malegaon Firing News) घटनेनं खळबळ उडाली होती. दुचाकी विक्रीच्या व्यवहारातून वाद झाला. त्यातून एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना मालेगाव शहराच्या (Malegaon crime) आल्लमा एकबाल पुलावर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करतायत. दुचाकीच्या व्यवहारातील 40 हजार रुपये मिळाले होते. तर अन्य 30 हजार रुपये एकाकडे बाकी होते. पैसे मागण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने बंदुकीने गोळीबार केली. सुदैवानं या गोळीबारातून तक्रारदार इसम बचावलाय. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या घटनेमुळे खुलेआम बंदुकीचा वापर होत असल्याचं अधोरेखित झालंय. पोलिसांच्या नाकावर टिच्चून बंदूक आणि गावठी कट्टे, तसंच धारदार हत्यारं वापरणाऱ्यांवर सवाही उपस्थित केले जात आहेत. यामुळे मालेगावातील गुन्हेगारीचं धगधगतं वास्तवही अधोरेखित झालंय.

मालेगावात गोळीबाराने खळबळ

आरफात नावाच्या इसमाच्या त्याच्या ताब्यातील बंदुकीने वकार नावाच्या व्यक्तीवर गोळी झाडली. वकार या तक्रारीतून थोडक्यात वाचलाय. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आता कारवाई काय होते, याकडे संपूर्ण मालेगावमधील जनतेचं लक्ष लागलंय.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात सर्रासपणे हत्यार वापरणे, गोळीबार करणे या घटना मालेगावात नेहमीच्याच झाल्या आहेत. गल्लीबोळात होणारी भांडण असो या मोबाइलवर झालेला वाद, यातून एकमेकांवर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुले नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हत्यारे, गावठी कट्टा वापरणाऱ्यांना पोलिसांचे भय नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

मालेगाव शहरातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचं गोळीबाराच्या घटनेनं अधोरेखित झालंय. मालेगाव शहरात किरकोळ कारणांवरुन झालेल्या भांडणात देखील गोळीबार सारख्या भीषण घटनेनं चिंता वाढवली आहे. शहरातील गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसून शहरात सर्रासपणे गावठी कट्टे, हत्यारांचा वापर होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं बोललं जातंय.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?