AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये रोखला 90 उंटाचा ताफा, राजस्थान कडून हैदराबादकडे जाणारा ताफ्यावर कसला संशय? नेमकं काय घडलं?

खरंतर हा उंटांचा ताफा नंदुबार, धुळे मार्गी महाराष्ट्र हद्दीत आला होता. त्यानंतर नागरिकांना हे उंट कशासाठी जात आहे याबाबत शंका येत होती. हे उंट तस्करी साठी तर नेले जात नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात होती.

नाशिकमध्ये रोखला 90 उंटाचा ताफा, राजस्थान कडून हैदराबादकडे जाणारा ताफ्यावर कसला संशय? नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 05, 2023 | 4:00 PM
Share

नाशिक : राजस्थान येथून हैदराबादकडे जाणाऱ्या जवळपास 90 उंटांचा ताफा तस्करी जात असल्याचा संशय नाशिकयेथील नागरिकांना आला होता. उंटांचा भला मोठा ताफा रस्त्याने जात असल्याचे पाहून नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये गुरुवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून उंट जात असल्याचे पाहून पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअरच्या प्रतिनिधींना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेतली होती. याबाबत पोलिसांना कळविण्यात आली होती. ही सर्व उंट पांजरपोळच्या जंगलात ठेवण्यात आली आहे. यामध्ये दोन उंटांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खरंतर हे उंट बघण्यासाठी नाशिकच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खरंतर हा उंटांचा ताफा नंदुबार धुळे मार्गी महाराष्ट्र हद्दीत आला होता. त्यानंतर नागरिकांना हे उंट कशासाठी जात आहे याबाबत शंका येत होती. हे उंट तस्करी साठी तर नेले जात नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात होती.

दरम्यान, नाशिक पर्यन्त हा उंटांचा ताफा आला तरी त्यांना कुणी अडवले नाही हे विशेष. मात्र, नाशिकमध्ये हा उंटांचा ताफा अडविण्यात आला आहे. पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअरचे प्रतिनिधी पुरुषोत्तम आव्हाड यांनी हा ताफा अडविला होता.

उंट तस्करी साठी जात असल्याची माहिती पोलिसांना पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअरच्या प्रतिनिधींनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. त्यामध्ये नाशिक शहराच्या जवळच असलेल्या पांजरपोळच्या जंगलात हे उंट जिल्हाधिकारी यांनी सोडण्याचे आदेश दिले आहे.

रात्री उशिरापर्यन्त ही सगळी प्रक्रिया केली जात होती. याच काळात उंट इतक्या मोठ्या प्रमाणात शहरात आलेच कसे, एका रांगेत चालत असल्याने नाशिककरांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये नागरिकांनी फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेयर केले आहे.

खरंतर या सर्व उंटासोबत चाळीस माणसं होती. त्याबाबत प्रत्येक जण वेगवेगळी उत्तरे देत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने खासदार मनेका गांधी यांच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया झाली असून अधिकचा तपास सुरू आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.