AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतीचा वाद टोकाला गेला, मग शेजाऱ्याने थेट जावयालाच…

शेताच्या बांधावर लेवल करण्याचे काम सुरु होते. यावेळी शेजाऱ्याने भांडण सुरु केले. मग हे भांडण इतके विकोपाला गेले की, सासऱ्याच्या वादात जावयाचा बळी गेला.

शेतीचा वाद टोकाला गेला, मग शेजाऱ्याने थेट जावयालाच...
शेतीच्या वादातून शेजाऱ्याने जावयाला संपवले
| Edited By: | Updated on: May 20, 2023 | 6:58 PM
Share

लातूर : शेतीच्या वादातून शेजाऱ्याने घरजावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. सतीश जमादार असे मयत जावयाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी रेणापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून मयत सतीश जमादार हे सासरवाडीत रहायला आले होते. त्यांचे सासरे आणि शेजारी यांच्यात बांधावरून वाद होता. या वादातून जावयाचा बळी गेला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातल्या समसापूर येथे ही घटना घडली. बांधावर माती टाकताना सुरु झालेल्या वादातून जावयावर वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सतीश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सासऱ्याचा शेजाऱ्यासोबत वाद होता

समसापूर येथे सतीश यांच्य सासऱ्याची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यासोबत सतीशच्या सासऱ्याचा सामाईक बांधावरुन वाद होता. हा वाद न्यायालयात रेणापूर न्यायालयात प्रलंबित होता. शुक्रवारी सकाळी जमादार यांचे सासरे शेताच्या बांधावर लेवल करण्याचे काम सुरु होते. यावेळी सतीश जमादार, त्यांची पत्नी, मेहुणा आणि सासूही शेतात उपस्थित होते. यावेळी शेजारी भारत फुलसे आणि त्याच्या परिवाराने सतीशची सासरे बळीराम खोडके यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर शिवीगाळ केली.

वादातून शेजाऱ्याने खोडके यांच्या जावयावर हल्ला केला

वाद इतका विकोपाला गेला फुलसे कुटुंबीयांनी खोडके यांचा जावई सतीशवर जीवघेणा हल्ला केला. खोडके कुटुंबीयांनी सतीशला तात्काळ रेणापूर येथील रुग्णायलात नेले. डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात पाठवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मेव्हणा आणि सासऱ्याच्या फिर्यादीवरुन जमादार यांच्या हत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.