AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुमधडाक्यात लग्न, घरात आनंदाचं वातावरण होतं, अचानक लाईट गेली अन्…

मुलाचे लग्न झाल्याने घरी उत्साहाचे वातावरण होते. विवाहानंतरच्या विधी सुरु होत्या. घरात पाहुणे मंडळी जमली होती. इतक्यात लाईट गेली अन् पुढे घातच झाला.

धुमधडाक्यात लग्न, घरात आनंदाचं वातावरण होतं, अचानक लाईट गेली अन्...
तरुणीची फसवणूक करणाऱ्या तरुणाला भरमांडवातून पोलिसांनी ताब्यात घेतले
| Updated on: May 15, 2023 | 5:21 PM
Share

मैनपुरी : उत्तर प्रदेशात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील नागला कंस गावात वीजेचा शॉक लागल्याने नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी तरुणाचे लग्न झाले होते. नवरा-नवरीच्या अंगावरील हळद उतरली नव्हती, अन् लग्नघरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. पतीच्या निधनामुळे नववधूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनू सिंग असे मयत तरुणाचे नाव असून, तो बीएचा विद्यार्थी होता. मयत सोनू आणि आरती यांचा 11 मे रोजी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

11 मे रोजी थाटामाटात विवाह पार पडला

मैनपुरीच्या नागला कंस गावातील सोनू सिंग याचा नागला सडा गावातील आरतीसोबत 11 मे रोजी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. सोनू सासरकडच्या मंडळींचा निरोप घेत नववधूला घरी घेऊन आला. नववधूचे उत्साहात घरी स्वागत झाले. घरी पै-पाहुणे जमले होते. विवाहानंतरचे रीतिरिवाज सुरु होते. यामुळे घरामध्ये अगदी उत्साहाचे वातावरण होते.

वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू

अचानक घरातील वीज गेली. सध्या उकाड्याचे दिवस असल्याने सर्व पाहुणे गरमीने हैराण झाले होते. यामुळे सोनू इन्व्हर्टरची तार लावायला गेला. यावेळी त्याला वीजेचा जोरदार झटका बसला आणि तो बेशुद्धावस्थेत जमिनीवर कोसळला. नातेवाईकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेला, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

सोनूच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वधूच्या हातावरील मेंदी पुसण्याआधीच ती विधवा झाली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनूच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.