AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क गुन्हेगारांनी केले पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण, राज्याच्या सीमेपलीकडे नेऊन…

Crime News: चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काही जण पोलिसांवर धावून आले. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

चक्क गुन्हेगारांनी केले पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण, राज्याच्या सीमेपलीकडे नेऊन...
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 15, 2025 | 9:25 PM
Share

Crime News: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले उमर्टी गावातून धक्कादायक बातमी आली आहे. या गावातून जळगाव पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाले आहे. गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करुन त्याला मध्य प्रदेशच्या सीमेत नेण्यात आले आहे. आता यासंदर्भात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.

काय घडला प्रकार

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाले. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काही जण पोलिसांवर धावून आले. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्या पोलीस कर्मचाऱ्याला काही जणांनी सिमेच्या पलीकडे मध्य प्रदेशातील उमर्टी गावात नेले.

वादानंतर पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण

पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस कर्मचारी व संबंधित गावात अवैध शस्त्र विक्री करणारे यांच्यात वाद झाल्यानंतर या वादात संबंधितांनी पोलीस कर्मचाऱ्याच अपहरण केल्याची माहिती मिळाली.

दोन राज्यात उमर्टी ही दोन गावे

महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव आहे. एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी उमर्टी गावाकडे रवाना झाले आहे. या बातमीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे. पोलीस कर्मचारी याला सुखरूप मिळवण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांची संपर्क सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Follow Us
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?