AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्यात मागील पाच दिवसांमध्ये सहा तरुण-तरुणी बेपत्ता, कारण समजताचं पालकांच्या पायाखालची जमीन सरकली, पोलिस…

एका वयात संपूर्ण महाराष्ट्रातून मुली आणि मुलं पळून जाण्याची संख्या अधिक आहे. त्यांना सध्या समूपदेशन करणं गरजेचं असल्याचं काही तज्ज्ञाचं मतं आहे. पोलिस अद्याप न सापडलेल्या मुलांच्या शोधात आहेत.

या जिल्ह्यात मागील पाच दिवसांमध्ये सहा तरुण-तरुणी बेपत्ता, कारण समजताचं पालकांच्या पायाखालची जमीन सरकली, पोलिस...
bhor police station puneImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 04, 2023 | 7:53 AM
Share

भोर : पुण्याच्या भोर पोलिस (pune bhor poloice station) ठाण्याच्या हद्दीतून, मागील पाच दिवसांमध्ये सहा तरुण-तरुणी बेपत्ता (youth missing) झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये चार मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. यापैकी पालक रागावल्यामुळे पळून गेलेल्या मुलाला पोलिसांनी शोधून पुन्हा घरी सोडलं आहे. तर एक मुलगी लग्न करून पोलिस ठाण्यात हजर झाली आहे. उर्वरित तीन मुली आणि एक मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे. बेपत्ता झालेले सर्व जण 18 ते 22 या वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वयात आलेल्या तरुण-तरुणी प्रेम प्रकरणातून पळून जात असल्यानं, या वयोगटातील तरुणांना समुपदेशनाची (counselling) गरज असल्याचं तज्ञ्जांनी मत व्यक्त केलं आहे.

जी मुलं घरातून पालक रागावल्यामुळं गेली होती. त्यापैकी काही जणांना पोलिसांनी तात्काळ घरी सोडलं आहे. त्याचबरोबर त्यांना समजून देखील सांगण्यात आलं आहे. पालकांना आणि त्या मुलाला अशी दोघांना पोलिसांनी समजूत घातली आहे. काही मुलींनी मनाच्या विरोधात लग्न ठरल्यामुळं आवडत्या मुलासोबत लग्न केलं असल्याची माहिती मिळाली आहे. 18 ते 22 या वयोगटातील मुलं मागच्या पाच दिवसांमध्ये गायब झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी चर्चा आहे.

उर्वरीत मुलांचा पोलिस शोध घेत आहेत. ती सुध्दा मुलं तिथंच कुठंतरी जवळपास असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्या मुलींनी लग्न केलं आहे. त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. कारण मुलीच्या लग्नासाठी त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांची तयारी केली होती अशी माहिती मिळाली आहे. त्या पालकांना सुध्दा पोलिसांनी समजवून सांगितलं आहे.

एका वयात संपूर्ण महाराष्ट्रातून मुली आणि मुलं पळून जाण्याची संख्या अधिक आहे. त्यांना सध्या समूपदेशन करणं गरजेचं असल्याचं काही तज्ज्ञाचं मतं आहे. पोलिस अद्याप न सापडलेल्या मुलांच्या शोधात आहेत.

Follow Us
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....