AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आळंदीमध्ये वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृ्त्यू

तिला आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणले जात होते. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत.

आळंदीमध्ये वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृ्त्यू
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 07, 2023 | 9:17 AM
Share

पुणे : वाहतूक कोंडी हा शहरात फार मोठा प्रश्न आहे. अशा वाहतूक कोंडीत सापडल्यानंतर पुढं निघणं कठीण होते. रुग्णावाहिकेसाठी विशेष सुविधा दिली गेली आहे. सायरन वाजवल्यानंतर रस्ता मोकळा करून दिला जातो. पण, कधी-कधी वाहतूक कोंडी येवढी मोठी असते की, त्यातून पुढं जाताचं येत नाही. अशीच एक दुर्घटना आळंदीमध्ये घडली. आळंदीमध्ये वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने 21 वर्षीय तरुणीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. उज्वला नामदेव झाडे असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. उज्वला ही आंब्याच्या झाडावरून पडून जखमी झाली होती. तिला आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणले जात होते. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

उज्ज्वला नामदेव झाडे ही मुलगी आंब्याच्या झाडावर चढली होती. झाडावरून तोल गेल्याने ती खाली पडली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रसत्याने जात असताना आळंदीत वाहतूक कोंडी होती. त्यामुळे तिची रुग्णावाहिका पुढं जाऊ शकत नव्हती. या वाहतूक कोंडीत ही रुग्णवाहिका सापडली. वेळेवर उपचार न मिळाल्याने उज्ज्वलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला.

तर तिचा जीव वाचला असता

उज्ज्वला झाडेला रुग्णालयात नेण्यात येत होते. आळंदीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जात होते. पण, रस्त्यात वाहतूक कोंडी खूप होती. ही वाहतूक कोंडी नसती तर तिचा जीव वाचला असता असं उज्ज्वलाचे नातेवाईक सांगत आहेत. उज्ज्वलाचे वय २१ वर्षे होते. ती तरुण असल्याने वेळेवर उपचार मिळाले असते, तर नक्कीच तिचा जीव वाचला असता. पण, उज्ज्वहा ही वाहतूक कोंडीचा बळी गेल्याची चर्चा आहे.

Follow Us
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला