AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : पीएमटी बसच्या धडकेत बाईकस्वार तरुण ठार! विवाहीत आकाशच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा

Pune PMT BUS Accident : आकाश विल्सन पिल्ले हा येरवडा गाडीतळ इथं राहायला होता. तो दुचाकीवर जात होता.

Pune Accident : पीएमटी बसच्या धडकेत बाईकस्वार तरुण ठार! विवाहीत आकाशच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा
पुण्यात बसचा अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 3:04 PM
Share

पुणे : बसच्या धडतकेत तरुणाचा जीव गेल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune District) विश्रांतवाडी इथं घडली. या अपघातामध्ये (Pune PMT Accident) विवाहीत तरुणाचा जीव गेला आहे. त्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुमाचं नाव आकाश विल्सन पिल्ले असं असून आकाश हा येरवडा गाडीतळ इथं राहायला होता. पीएमटी बसने आकाशच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की आकाशचा जागीच मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी पीएमटी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमसी बसच्या चालकाचं नाव अज कामठे असून त्यांच्यावर विश्रांतावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी (Pune Accident News) पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र तरुणाच्या मृत्यूने विश्रांतवाडीवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.

आकाश विल्सन पिल्ले हा येरवडा गाडीतळ इथं राहायला होता. तो दुचाकीवर जात होता. त्यावेळी पीएमसी बसची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. पीएमटीची ही बस आळंदीहून स्वारगेटला जात होती. दरम्यान, डेक्कन कॉलेज जवळ झालेल्या या भीषण अपघातात आकाश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, त्याचा मृ्यू झाला.

दुचाकीवरुन जाताना काळीज घेण्याची गरज

दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट वापरण्याची नितांत गरज असल्याचं या घटनेवरुन अधोरेखित झालं आहे. तसंच अपघातात होऊ नयेत, यासाठी वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याची आणि वेगावर मर्यादा ठेवण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे अपघात रोखायचे असतील, तर वाहतुकीचे सर्व नियम पाळण्यासोबत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी दुचाकी चालकांनी बाळगणं गरजेचं आहे. तसं केल्यानंतरही अपघाताचा धोका टळतो असं नाही. मात्र किमान अपघात होण्याची भीती कमी होते. वेगानं आणि बेदरकारपणे गाड्या चालवून अपघाताला निमंत्रण देण्यापेक्षा संतुलित वेग पाळावा, असं आवाहन दुचाकीस्वारांना केलं जातंय.

Follow Us
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.