AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आरोपीचा कोणत्या पक्षाचा हे पाहू नका, त्याला तात्काळ अटक करा”, ठाण्यातील ‘त्या’ घटनेवर राज ठाकरेंचा संताप

ठाण्यात ११ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याला जामीन मिळाल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि पोलिसांनाही कडक कारवाईची सूचना केली.

आरोपीचा कोणत्या पक्षाचा हे पाहू नका, त्याला तात्काळ अटक करा, ठाण्यातील 'त्या' घटनेवर राज ठाकरेंचा संताप
महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
| Updated on: Oct 18, 2024 | 2:54 PM
Share

Raj Thackeray Demand Arrest Thane Assault Case Victim : शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने ठाण्यात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपीला जामीन देण्यात आला. यामुळे मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर यावेळी राज ठाकरेंनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. “या घटनेत आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्या पीडित मुलीचा पुन्हा जबाब नोंदवा आणि आरोपीला अटक करा” अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानतंर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना चांगलंच सुनावलं. “माझं आताच पोलिसांशी बोलणं झालं. मी त्यांना हेच सांगितलं की बदलापूरसारखं सगळ्या गोष्टी तुम्ही अंगावर घेऊ नका. तो कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचे नाही. कधी कुठल्या पक्षाची ही भूमिका नसते. जर आपण एखाद्या अशा माणसाची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू तर बघायलाच नको. तो कुठच्याही पक्षाचा असला तरी अशा कृत्यांना पाठीशी घालू नये”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“एखादा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्ट जामीन कसा मिळतो, हेच मला कळत नाही. त्यामुळेच मी सांगितलं की त्या मुलीचा जबाब परत घ्या. तो जो कोणी आरोपी आहे त्याला पुन्हा अटक करा”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

नेमकं प्रकरण काय?

ठाण्यातील भंडार आळीत एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याला अटक करण्यात आली. मात्र त्याची जामिनावर सुटकाही झाली. या घटनेनंतर आरोपीवर कडक कारवाई व्हावी, यासाठी मनसेसह ठाण्यातील जनतेने गुरुवारी मोर्चा काढला. ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाही, तर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल असा इशारा मनसेनं दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी आज प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली.

Follow Us
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
मोठी बातमी! शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा