AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाला पोरींसारखं नटवलं अन् अख्खं कुटुंबच संपलं, चिठ्ठी पाहून पोलीसह चक्रावले!

चिमुकल्याच्या आईने त्याला मुलीसारखं सजवलं आणि एकूण चौघांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मुलाला पोरींसारखं नटवलं अन् अख्खं कुटुंबच संपलं, चिठ्ठी पाहून पोलीसह चक्रावले!
| Updated on: Jul 03, 2025 | 2:44 PM
Share

Rajasthan Crime News : त्या चिमुकल्याच्या आईने त्याचा एखाद्या मुलीप्रमाणे साज केला. त्या चिमुकल्याच्या डोक्यावर ओढणी ठेवली, त्याला काजळ लावलं. सोबतच त्या चिमुकल्याच्या अंगावर दागिने चढवले आणि त्यानंतर आई-वडील यांच्यासह अन्य दोघांनी सामूहिक आत्महत्या केली. या सामूहिक हत्येच्या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराच्या वादामुळे त्रस्त झाल्याने अख्ख्या कुटंबानेच हे सामूहिक आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे. शिव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील उण्डू गावात हे सामूहिक आत्महत्येचे कांड समोर आले आहे. घर आणि संपत्तीच्या वादातून एका कुंटबाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे नेमके कारण नमूद करण्यात आले आहे.

शिवलाल यांचा मुलगा नगाराम, नगाराम यांची पत्नी कविता, नगाराम आणि कविता यांची दोन मुलं बजंरग (9) आणि रामदेव (8) अशा चौघांचा समावेश आहे. या चौघांचेही मृतदेह घरापासून साधारण 20 मीटर दूर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आले आहेत.

आत्महत्या करण्याआधी नेमकं काय केलं?

पोलिसांना आत्महत्येच्या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत नगाराम यांनी त्यांच्या भावावर आरोप केले आहेत. माझ्या लहान भावामुळेच मी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, असे या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. घर तसेच जमिनीच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या वादामुळे मी आणि माझे कुटुंबीय हा निर्णय घेतोय, असंही सुसाईड नोटमध्ये सांगण्यात आलंय. तसेच आम्हा सर्वांवर घरासमोरच अंत्यसस्कांर करावेत अशी इच्छाही या सुसाईड नोटमध्ये व्यक्त करण्यात आलीय.

दरम्यान, हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर राजस्थान राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात