AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story चित्रपटाबद्दल चांगलं बोलण्याची विश्व हिंदू परिषदेच्या सदस्याला चुकवावी लागली मोठी किंमत

The Kerala Story : "व्हॉट्सअप स्टेटसवर चित्रपटात कौतुक करुन, तू आमच्या समाजाचा अपमान केला, असं ते तिघे बोलल्याच पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं"

The Kerala Story चित्रपटाबद्दल चांगलं बोलण्याची विश्व हिंदू परिषदेच्या सदस्याला चुकवावी लागली मोठी किंमत
the kerala story
| Updated on: May 08, 2023 | 2:30 PM
Share

जयपूर : सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाबद्दल चांगलं मत व्यक्त करणं एका माणसाला चांगलच महाग पडलय. या माणसाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘द केरळ स्टोरी’ बद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. या माणसाने त्याच्या व्हॉट्स अप स्टोरीमध्ये तरुण महिलांना ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्याची विनंती केली होती. म्हणून या माणसाला बेदम मारहाण करण्य़ात आली. त्याला धमकावण्यात आलं.

राजस्थानमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. ज्याला, मारहाण झाली तो विश्व हिंदू परिषदेचा सदस्य आहे. मंदिर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार नोंदवली आहे. तिघांविरोधात त्याने FIR नोंदवलाय.

‘तू आमच्या समाजाचा अपमान केला’

“पीडीत व्यक्ती शनिवारी रात्री आपल्या घरी येत होता. त्यावेळी तिघांनी त्याला वाटेत अडवलं. व्हॉट्सअप स्टेटसवर चित्रपटाच कौतुक करुन, तू आमच्या समाजाचा अपमान केला, असं ते तिघे बोलल्याच पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं” सहाय्यक पोलीस आयुक्त देरावर सिंह यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

चित्रपटात काय दाखवलय?

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘द केरळ स्टोरी’चा टीझर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. 30 हजारपेक्षा जास्त महिलांच इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे. शुक्रवारी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झालाय. त्यावरु विविध वाद, प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलींच इस्लाममध्ये धर्मांतर झाल्यानंतर त्यांना अफगाणिस्तान, येमेन आणि सिरिया या देशांमध्ये पाठवण्यात येतं, असा द केरळ स्टोरीचा दावा आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.