पतीने मोबाईलचं लॉक उघडून दिलं नाही म्हणून पत्नीची गळफास घेत आत्महत्या

Sangli Suicide : शुक्रवारी सकाळी भगवान यांचा मोबाईल पत्नी मनीषा हिने घेतला. मोबाईलचं लॉक काढून द्या, असा हट्ट ती भगवान यांच्याकडे धरू लागली. पण भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाईलचं लॉक काढून दिला नाही त्यामुळे मनिषा निराश झाली.

पतीने मोबाईलचं लॉक उघडून दिलं नाही म्हणून पत्नीची गळफास घेत आत्महत्या
आत्महत्येनं खळबळ...
Image Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Aug 27, 2022 | 4:17 PM

सांगली : बायको नवऱ्यावर कशामुळे रागवेल, याचा की नेम नाही. पण आता सांगलीतून आत्महत्येची (Sangli Suicide News) जी धक्कादायक घटना समोर आली आहे, ती काळजाचा थरकाप उडवणारीच आहे. मोबाईलचं लॉक (Mobile Lock) उघडून दिलं नाही, म्हणून एका विवाहितेनं जीव दिलाय. नवऱ्याने मोबाईलचं लॉक उघडून द्यावं म्हणून ही महिला सारखी हट्ट करत होती. पण नवऱ्याने दुर्लक्ष केलं. अखेर निराश झालेल्या बायकोनं घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली आहे. बायकोला घरातील एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहून नवऱ्यालाही मोठा धक्का बसला. या घटनेनं परिसरातही एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात घडली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आत्महत्येची ही घटना घडकीस आली. त्यानंतर याबाबत पोलिसांनाही (Islampur Police, Sangli) कळवण्यात आलं. पोलिसांकडून सध्या या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

खळबळजनक!

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे इथं एका विवाहितेनं आत्महत्या घडल्यानं खळबळ माजलीय. मनिषा भगवान खोत असं मृत महिलेचं नाव आहे. काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगलीच्या इस्लामपूर पोलीस ठाण्यात शिवाजी निवृत्त खोत यांनी फिर्याद दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

वाळवा तालुक्यातील शिरटे येथे सामान्य कुटुंबातील भगवान खोत हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अल्प शेती असल्याने भगवान खोत साखर कारखान्यात नोकरी देखील करायचे. नोकरी आणि शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवत होते.

शुक्रवारी सकाळी भगवान यांचा मोबाईल पत्नी मनीषा हिने घेतला. मोबाईलचं लॉक काढून द्या, असा हट्ट ती भगवान यांच्याकडे धरू लागली. पण भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाईलचं लॉक काढून दिला नाही त्यामुळे मनिषा निराश झाली. चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन तिने साडीच्या साह्याने गळफास घेतला आणि आत्महत्या केली. सध्या पोलिसांकडून या आत्महत्याप्रकरणी पुढील तपास केला जातोय. या घटनेनं वाळवा तालुका हादरुन गेलाय.