AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जात होते, माय-लेक जिवानिशी गेले, हृदयपिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना

हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेत बैलगाडीचा संपूर्ण चुराडा होऊन बैलगाडीच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल देखील जखमी झाला आहे.

टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जात होते, माय-लेक जिवानिशी गेले, हृदयपिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 30, 2022 | 10:07 AM
Share

नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोडीला गेलेल्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला महामंडळाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील मायलेक जागीच ठार झाले तर वडील आणि मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.या घटनेत बैलगाडीचा चुराडा झाला असून एक बैल देखील ठार झाला आहे..ही घटना औरंगाबाद-पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ घडली. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माणिकपुंज येथील ऊसतोड कामगार गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे, सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे असे एकाच कुटुंबातील चार जण बैलगाडीतून औरंगाबाद-पुणे महामार्गाने जात होते. त्यांची बैलगाडी ईसारवाडी फाट्याजवळील इंडियन ढाब्यापासून महामार्ग ओलांडत होती. त्याचवेळी नाशिककडून-औरंगाबादकडे जाणारी एस.टी.महामंडळाच्या बसने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात बैलगाडी मधील सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे हे दोघे मायलेक असे दोन जण जागीच ठार झाले आहेत.

तर सोन्याबाई यांचे पती गोविंद गिरे व मुलगा बाळू गोविंद गिरे हे जखमी झाले आहे.यातील एकाची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेत बैलगाडीचा संपूर्ण चुराडा होऊन बैलगाडीच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल देखील जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस अपघातस्थळी दाखल झाले होते त्यांनी जखमींना उपचारासाठी गंगापूर व औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले होते.

ऊसतोड कामगार असलेल्या माय – लेकाचा मृत्यू झाल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

राज्य सरकारने ही घटना गांभीर्याने घ्यावी तसेच स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी व्यापक अपघात व आरोग्य विमा योजना सुरू करावी अशी मागणी देखील केली आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.