AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री मंदिरात झोपायला गेले होते दोघे ग्रामस्थ, सकाळी थेट मृतदेहच आढळले !

शेताची राखण करण्यासाठी दोन ग्रामस्थ रात्री मंदिरात झोपले होते. पहाटे जेव्हा गावकरी मंदिरात आले तेव्हा दोघेही मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

रात्री मंदिरात झोपायला गेले होते दोघे ग्रामस्थ, सकाळी थेट मृतदेहच आढळले !
चंद्रपूरमध्ये दोन ग्रामस्थांची हत्याImage Credit source: TV9
| Updated on: Mar 23, 2023 | 11:34 AM
Share

चंद्रपूर / निलेश डहाट : चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मांगली गावात जगन्नाथ बाबांचे छोटे मंदिर आहे. या मंदिरात रात्री झोपायला गेलेल्या गावातील दोन व्यक्तींची अज्ञात आरोपींना हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मधुकर खुजे आणि बापूराव खारकर अशी हत्या करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.

शेतीच्या राखणसाठी मंदिरात झोपले होते

मांगली गावातील मधुकर खुजे आणि बापूराव खारकर यांची जगन्नाथ बाबा मंदिराच्या शेजारी शेती आहे. या शेतीची राखण करण्यासाठी हे दोघे ग्रामस्थ मंदिरात झोपायला जायचे. नेहमीप्रमाणे काल रात्री हे दोघे मंदिरात झोपायला गेले होते. मात्र पहाटे दोघांचेही जण रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आले. यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय

घटनेची माहिती तात्काळ भद्रावती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. यावेळी मंदिरातील दानपेटी असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींनी हत्या नेमकी कशी केली हे अद्याप कळू शकले नाही. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

गोंदियात कौटुंबिक वादातून तरुणाला संपवले

कौटुंबिक वादातून 29 वर्षीय तरुणाला संपवल्याची धक्कादायक गोंदियातील चांदनीटोला येथे घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संदीप भाऊलाल चिखलोंडे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर जितेंद्र धनलाल ठाकरे आणि विनोद नेतलाल ठाकरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.