AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Drowned Death : सोलापूरमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू

शेटफळमधील गोरख डोंगरे यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले आहे. या शेततळ्यात गावातील तीन शाळकरी मुले दुपारच्या सत्रात पोहण्यासाठी गेली होती. गावातील तांबट समाजातील ही तीनही मुले होती. मात्र शेततळ्यात उतरल्यानंतर त्यातील दोघांना पोहता येत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Solapur Drowned Death : सोलापूरमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू
सोलापूरमध्ये शेततळ्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 10:29 PM
Share

सोलापूर : शेततळ्यात बुडून 3 बालकां (Children)चा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील शेटफळ या गावात घडली आहे. शेटफळमधील देवीचा माळ परिसरात ही घटना घडली. विनायक भरत निकम (8), सिध्दार्थ भरत निकम (7) आणि कार्तिक मुकेश हिंगमीरे (7) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. शेततळ्यात पोहण्या (Swimming)साठी गेली असता ही घटना घडली. मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. मयत बालकं तांबटकरी समाजातील होती. या शेततळ्याला तारेचे कुंपण नसल्याची माहिती समोर येत आहे.

पोहता येत नसल्यामुळे बुडाली मुले

शेटफळमधील गोरख डोंगरे यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले आहे. या शेततळ्यात गावातील तीन शाळकरी मुले दुपारच्या सत्रात पोहण्यासाठी गेली होती. गावातील तांबट समाजातील ही तीनही मुले होती. मात्र शेततळ्यात उतरल्यानंतर त्यातील दोघांना पोहता येत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विनायक निकम (8), सिध्दार्थ निकम (7) आणि कार्तिक हिंगमिरे (7) हे तिघे शेततळ्यात उतरले. मात्र यातील दोघांना पोहता येत नसल्याने दोघांनी एकाला पकडल्याने तिघेही बुडाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

यामध्ये मुकेश हिंगमिरे हे मुळचे शेटफळ गावाचे रहिवासी आहेत. तर त्यांचे भावजी भरत निकम हे देखील माचणूर या गावातून मेव्हणे मुकेश हिंगमिरे यांच्याकडे स्थायिक झाले होते. दरम्यान त्यांचा तांबटाचा व्यवसाय आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास या दोन्ही कुटुंबातील मुले शेततळ्यात पोहण्यासाठी गेले आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर या तीनही मुलांना जवळच्या खासगी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र तेथून त्यांना मोहोळ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांकडू देण्यात आली. दरम्यान या घटनेची नोंद मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.