AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीपुरीवरून रणकंदन.. लाठीमार, दगडफेक आणि गोळीबारही.. नेमकं काय झालं ?

पाणीपुरी... बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आणि वीकपॉईंट.. अनेक लोकं दिवसाच्या कोणत्याही प्रहरी पाणीपुरी खाण्यास तयार असता. पण याच पाणीपुरीवरून कानपूरमध्ये अक्षरश: रणकंदन माजलं. पाणीपुरी खाण्याच्या मुद्यावरून झालेला वाद एवढा वाढला तिथे दणादण गोळीबार झाला.

पाणीपुरीवरून रणकंदन.. लाठीमार, दगडफेक आणि गोळीबारही.. नेमकं काय झालं ?
| Updated on: May 24, 2024 | 10:46 AM
Share

पाणीपुरी… बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आणि वीकपॉईंट.. अनेक लोकं दिवसाच्या कोणत्याही प्रहरी पाणीपुरी खाण्यास तयार असता. पण याच पाणीपुरीवरून कानपूरमध्ये अक्षरश: रणकंदन माजलं. पाणीपुरी खाण्याच्या मुद्यावरून झालेला वाद एवढा वाढला तिथे दणादण गोळीबार झाला आणि एक डझनहून अधिक लोक जखमी झाले. खरंतर , बुधवारी सायंकाळी राणीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र चौकात एका हातगाडीजवळ पाणीपुरी खाण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. रिपोर्टनुसार, वादानंतर काही वेळाने एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या दुकानावर हल्ला केला, ज्यामध्ये जोरदार दगडफेक झाली आणि लाठ्यांचाही वापर करण्यात आला. याचदरम्यान, छतावर चढलेल्या घरमालकाने त्याच्याकडील बंदुकीतून गोळीबार सुरू केला. या वादात दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले , मात्र कोणीही गंभीर जखमी नसल्याचा दावा पोलिस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

या घटनेतील एका पक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी 9 लोकांविरुद्ध आणि 10 अज्ञााताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जमावातील लोकांनी दगड फेकले आणि गोळीबार केल्याचा आरोप आहे. यावेळी अनियंत्रित जमावाने चौकाचौकात असलेल्या दुकानात व घरात घुसून महिला व लहान मुलांना मारहाण केली.

या घटनेची सूचना मिळाल्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले असता काही महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूर रोशनी गावातील रहिवासी सत्यम सिंह राजेंद्र हे पाण्याची बाटली घेण्यासाठी चौकात कारमधून खाली उतरले होते. तेव्हा तेथे आधीच उपस्थित असलेला गंगा सिंग नावाचा तरुण गाडीजवळ पाणीपुरी खात होता. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली, त्यानंतर हाणामारी झाली. यानंतर नीलम सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर्यनगर येथील रहिवासी दीपू, हरिशंकर, लाला तांडिया, लालू, हरिकिशन, सुनील, कल्लू, गंगा सिंग, लल्लन आणि १० अज्ञात लोकांविरुद्ध रानिया पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी शेकडो लोकांनी दुसऱ्या पक्षाच्या दुकानावर हल्ला केला. आपल्याविरोधात चुकीचा अहवाल लिहिण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. त्यावेळी दुकानाच्या आजूबाजूला जो कोणी दिसला त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर दुकानमालक रवी गुप्ता यांनी टेरेसवर त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.