AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udaipur Massacre : “आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?” कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना एकच सवाल सतावतोय…

मारेकऱ्यास आता हाची विचार छळतो....

Udaipur Massacre : आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय? कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना एकच सवाल सतावतोय...
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 1:33 PM
Share

मुंबई : उदयपूर हत्याकांडातील आरोपी सध्या एनआयएच्या (NIA) ताब्यात आहेत. या आरोपींची कसून तपासणी केली असता काही बाबी समोर आल्या आहेत. कन्हैयालालला (Kanhayalal) मारण्याचा कट गुन्हा घडला, त्याच्या एक आठवडा आखण्यात आला होता. ज्यामध्ये गोस मोहम्मद, रियाझ अत्तारी या दोघींनी तयारीही सुरू केली होती. चाकू वापरून हत्या करण्याचा त्यांनी विचार केला. रियाझ आणि घौस हे दोघेही सुफी बरेलवी मुस्लिम आहेत. या दोघांनाही आता मृत्यूचं भय सतावतंय.”आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?”, असं हे दोघं एनआयएच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारत आहेत. त्यांना भ्याड गुन्ह्याचा दावा करणारा व्हीडिओ शूट करण्यासाठी अजमेर दर्ग्याकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. शिवाय राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांना पत्र लिहिले आहे.

मारेकऱ्यांना मृत्यूचे भय

या दोनही मारेकऱ्यांना आता मृत्यूचं भय सतावतंय.”आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?”, असं हे दोघं एनआयएच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारत आहेत.

डोटासरा यांचं एनआयए महासंचालकांना पत्र

राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. उदयपूर घटनेच्या तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेतील आरोपी मोहम्मद रियाझ याच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बाबी लक्षात घेऊन एजन्सीने तपासाची व्याप्ती वाढवली पाहिजे, असे डोटासरा यांनी एनआयए महासंचालकांना सांगितलं आहे.

डोटासराने पत्रात लिहिले आहे की, मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथे जम्मू पोलिसांनी अटक केली. त्यापैकी दोन दहशतवाद्यांपैकी एक ताली हुसैन शाह हा भाजपच्या जम्मू अल्पसंख्याक मोर्चाचा सोशल मीडिया प्रभारीला देखील होता. डोटासरा म्हणाले, “सत्तेच्या लालसेपोटी भाजप देशविरोधी कारवायांना साथ देत नसल्याच्या या बातम्यांमुळे देशवासीयांमध्ये अस्वस्थता आहे. ही शंका दूर करण्यासाठी एनआयएने दोन्ही घटनांच्या तपासाची व्याप्ती वाढवली पाहिजे. स्थानिक भाजप नेत्यांचा जनतेशी काहीही संबंध नसून त्यांच्यात एक आंधळी शर्यत सुरू आहे, ज्यामध्ये त्यांना केवळ मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनायचे आहे.”

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...