AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udaipur Massacre : “आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?” कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना एकच सवाल सतावतोय…

मारेकऱ्यास आता हाची विचार छळतो....

Udaipur Massacre : आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय? कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना एकच सवाल सतावतोय...
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 1:33 PM
Share

मुंबई : उदयपूर हत्याकांडातील आरोपी सध्या एनआयएच्या (NIA) ताब्यात आहेत. या आरोपींची कसून तपासणी केली असता काही बाबी समोर आल्या आहेत. कन्हैयालालला (Kanhayalal) मारण्याचा कट गुन्हा घडला, त्याच्या एक आठवडा आखण्यात आला होता. ज्यामध्ये गोस मोहम्मद, रियाझ अत्तारी या दोघींनी तयारीही सुरू केली होती. चाकू वापरून हत्या करण्याचा त्यांनी विचार केला. रियाझ आणि घौस हे दोघेही सुफी बरेलवी मुस्लिम आहेत. या दोघांनाही आता मृत्यूचं भय सतावतंय.”आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?”, असं हे दोघं एनआयएच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारत आहेत. त्यांना भ्याड गुन्ह्याचा दावा करणारा व्हीडिओ शूट करण्यासाठी अजमेर दर्ग्याकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. शिवाय राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांना पत्र लिहिले आहे.

मारेकऱ्यांना मृत्यूचे भय

या दोनही मारेकऱ्यांना आता मृत्यूचं भय सतावतंय.”आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?”, असं हे दोघं एनआयएच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारत आहेत.

डोटासरा यांचं एनआयए महासंचालकांना पत्र

राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. उदयपूर घटनेच्या तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेतील आरोपी मोहम्मद रियाझ याच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बाबी लक्षात घेऊन एजन्सीने तपासाची व्याप्ती वाढवली पाहिजे, असे डोटासरा यांनी एनआयए महासंचालकांना सांगितलं आहे.

डोटासराने पत्रात लिहिले आहे की, मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथे जम्मू पोलिसांनी अटक केली. त्यापैकी दोन दहशतवाद्यांपैकी एक ताली हुसैन शाह हा भाजपच्या जम्मू अल्पसंख्याक मोर्चाचा सोशल मीडिया प्रभारीला देखील होता. डोटासरा म्हणाले, “सत्तेच्या लालसेपोटी भाजप देशविरोधी कारवायांना साथ देत नसल्याच्या या बातम्यांमुळे देशवासीयांमध्ये अस्वस्थता आहे. ही शंका दूर करण्यासाठी एनआयएने दोन्ही घटनांच्या तपासाची व्याप्ती वाढवली पाहिजे. स्थानिक भाजप नेत्यांचा जनतेशी काहीही संबंध नसून त्यांच्यात एक आंधळी शर्यत सुरू आहे, ज्यामध्ये त्यांना केवळ मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनायचे आहे.”

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.